शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

गोदावरी कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:20 IST

कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाच्या दारणा धरणातून कोपरगाव तालुक्याच्या लाभक्षेत्रातील गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावीत, ...

कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाच्या दारणा धरणातून कोपरगाव तालुक्याच्या लाभक्षेत्रातील गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावीत, अशी मागणी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पाटबंधारे विभागाचे राज्य सचिव यांना इमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

काळे म्हणाले, नाशिक पाटबंधारे विभागाचे गोदावरी डावा व उजवा कालव्यासाठी दारणा धरणातील आठ व गंगापूर धरणातील ३ टीएमसी पाणी आरक्षित आहे. असे एकूण ११ टीएमसी आरक्षित आहे. २६ मार्च अखेर दारणा धरणात ५ व गंगापूर धरणात ३ टीएमसी पाणी शिल्लक होते. तसेच रब्बी हंगामाच्या अवर्तनात केवळ दोन ते अडीच टीएमसी पाणी वापरले गेले आहे. सध्या दारणा धरणात पाच टीएमसी पाणी शिल्लक आहे. रब्बीतील गहू, हरभरा, मका आदी पिके संपली आहे. त्यामुळे जर रब्बीमध्ये अडीच टीएमसी पाण्यात एक आवर्तन झाले, तर उन्हाळ्यात शिल्लक पाच ते सात टीएमसी पाण्यात एप्रिल व मे मध्ये निश्चितच दोन आवर्तने होऊ शकतात. त्यामुळे पाटबंधारे १५ ते ३० एप्रिल आणि १५ ते ३० मे असे दोन उन्हाळ आवर्तने द्यावीत.