शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न द्या : काँग्रेसची मागणी

By अरुण वाघमोडे | Updated: January 3, 2024 15:45 IST

अहमदनगर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे त्याकाळी उघडी केली म्हणूनच मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. सावित्रीबाई ...

अहमदनगर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे त्याकाळी उघडी केली म्हणूनच मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. सावित्रीबाई व महात्मा फुले या दांपत्याने तत्कालीन समाजामध्ये केलेल्या क्रांतिकारी कामामुळेच आज शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली आहे. म्हणूनच फुले दांपत्याला केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली.

काँग्रेस कार्यालयात बुधवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी काळे बोलत होते. यावेळी ओबीसी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, विलास उबाळे, गणेश चव्हाण, उषा भगत, मिनाज सय्यद, चंद्रकांत उजागरे, अभिनय गायकवाड, रोहिदास भालेराव, गणेश चव्हाण, किशोर कोतकर, गौरव घोरपडे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, सचिन लोंढे, देवराम शिंदे आदी उपस्थित होते. काळे म्हणाले स्वतःच्या कुटुंबाला दिशा देण्याबरोबरच समाजालाही दिशा देण्याची ताकद आजच्या महिलांमध्ये आहे.

क्षेत्र कोणतेही असो सर्वच ठिकाणी आज महिला स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे येताना दिसत आहेत. ही बाब महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ त्याकाळी रोवली व रुजवली यामुळेच आजची महिला आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहू शकली आहे.