शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न द्या : काँग्रेसची मागणी

By अरुण वाघमोडे | Updated: January 3, 2024 15:45 IST

अहमदनगर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे त्याकाळी उघडी केली म्हणूनच मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. सावित्रीबाई ...

अहमदनगर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे त्याकाळी उघडी केली म्हणूनच मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. सावित्रीबाई व महात्मा फुले या दांपत्याने तत्कालीन समाजामध्ये केलेल्या क्रांतिकारी कामामुळेच आज शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली आहे. म्हणूनच फुले दांपत्याला केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली.

काँग्रेस कार्यालयात बुधवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी काळे बोलत होते. यावेळी ओबीसी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, विलास उबाळे, गणेश चव्हाण, उषा भगत, मिनाज सय्यद, चंद्रकांत उजागरे, अभिनय गायकवाड, रोहिदास भालेराव, गणेश चव्हाण, किशोर कोतकर, गौरव घोरपडे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, सचिन लोंढे, देवराम शिंदे आदी उपस्थित होते. काळे म्हणाले स्वतःच्या कुटुंबाला दिशा देण्याबरोबरच समाजालाही दिशा देण्याची ताकद आजच्या महिलांमध्ये आहे.

क्षेत्र कोणतेही असो सर्वच ठिकाणी आज महिला स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे येताना दिसत आहेत. ही बाब महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ त्याकाळी रोवली व रुजवली यामुळेच आजची महिला आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहू शकली आहे.