शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

मुलींच्या उपस्थिती भत्त्यासाठी 30 लाख

By admin | Updated: July 22, 2014 00:05 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील दुर्बल घटकातील पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलींना उपस्थिती भत्त्यापोटी ३० रुपये देण्यात येणार आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील दुर्बल घटकातील पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलींना उपस्थिती भत्त्यापोटी ३० रुपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ज्या शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे, त्या शाळा दररोज तासभर आधी सुरू करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर भर देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक बैठक झाली. यावेळी जिल्ह्यात दुर्बल घटकात मोडणाऱ्या कुटुंबातील मुलींना प्रतीदिन एक रुपये प्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी २९ लाख ९३ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. सदस्य परतब नाईकवाडी यांनी जिल्ह्यात ज्या प्राथमिक शाळांचा दर्जा ढासाळलेला आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी दररोज अतिरिक्त तास भर अध्यापन करण्याची मागणी केली. त्यानुसार शाळा दररोज तास भर आधी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.या आर्थिक वर्षात दप्तर खरेदीसाठी ९ लाख ७० रुपयांची ई-निविदा काढण्याचा, शाळा व्यवस्थापन समितीने साडेचार कोटींचे गणवेश तातडीने खरेदी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे, एबीएल कृतीयुक्त अध्ययन पध्दतीनेच सॉफ्टवेअर खरेदी १ कोटी रुपयांच्या योजनेला मंजूरी देण्यात आली. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्रश्नावली तयार करून त्यात शंभर टक्के शिक्षकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांना अतिरिक्त दोन गुण देण्याची सूचना यावेळी करण्यात आली.स्काऊट गाईड योजनेचा जिल्हा मेळावा व प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५ लाख ३० हजारांच्या योजनेला मान्यता देण्यात आली. जिल्हास्तर शालेय महिला व ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या स्पर्धास शुल्क आहेत. सभेला सदस्या डॉ. प्रतिभा पाचपुते, परतब नाईकवाडी, सुरेखा राजेभोसले, मिनाक्षी थोरात, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सुंनदा ठुबे उपस्थित होते. (प्रतिनिधी)आठ दिवसात शिक्षकांची पदोन्नती प्रक्रियाआठ दिवसात शिक्षकांची पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकरी गोविंद यांनी दिली. एक आॅगस्टपासून शिक्षकांना ओळखपत्र देण्यात येणार असून शाळांमध्ये हे ओळखपत्र न वापरणाऱ्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.