शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

तुकाई चारीसाठी कर्जत तहसीलसमोर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:52 IST

कर्जत तहसील कार्यालयासमोर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल तुकाई चारी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कर्जत : एका गावासाठी अंगावर रॉकेल ओतून घेणारे पालकमंत्री २१ गावांना वरदान ठरणार असलेल्या तुकाई चारीच्या प्रश्नावर गप्प का बसले आहेत? याचा विचार जनतेने करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी येथे बोलताना केले. कर्जत तहसील कार्यालयासमोर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल तुकाई चारी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील सुर्यवंशी, सतिष लाघुडे, सतिष पाटील, मिलिंद बागल, रामदास सूर्यवंशी, भा.को. साळवे, आंदोलक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी व कुकडीचे आधिकारी व तहसीलदार किरण सावंत पाटील यावेळी उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील २१ गावांना वरदान ठरणारी तुकाई चारी योजना व्हावी, या एक वर्षापासून बाळासाहेब त्रिंबक सूर्यवंशी हे आत्मक्लेश आंदोलन कर्जत तहसीलदार कार्यालयापुढे करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास २१ गावातील सर्व शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महिला यांचा आंदोलनास पाठिंबा आहे. या सर्वाच्या वतीने मंगळवारी येथे येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी किरण पाटील, सुनील टकले, रामा तनपुरे, बाळासाहेब सूर्यवंशी, सतिष लाघुडे, रामदास सूर्यवंशी,भगवान घोडके, कमलाकर शेटे, बबन दळवी, सलीम आतार यांची भाषणे झाली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत