शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

तुकाई चारीसाठी कर्जत तहसीलसमोर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:52 IST

कर्जत तहसील कार्यालयासमोर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल तुकाई चारी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कर्जत : एका गावासाठी अंगावर रॉकेल ओतून घेणारे पालकमंत्री २१ गावांना वरदान ठरणार असलेल्या तुकाई चारीच्या प्रश्नावर गप्प का बसले आहेत? याचा विचार जनतेने करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी येथे बोलताना केले. कर्जत तहसील कार्यालयासमोर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल तुकाई चारी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील सुर्यवंशी, सतिष लाघुडे, सतिष पाटील, मिलिंद बागल, रामदास सूर्यवंशी, भा.को. साळवे, आंदोलक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी व कुकडीचे आधिकारी व तहसीलदार किरण सावंत पाटील यावेळी उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील २१ गावांना वरदान ठरणारी तुकाई चारी योजना व्हावी, या एक वर्षापासून बाळासाहेब त्रिंबक सूर्यवंशी हे आत्मक्लेश आंदोलन कर्जत तहसीलदार कार्यालयापुढे करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास २१ गावातील सर्व शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महिला यांचा आंदोलनास पाठिंबा आहे. या सर्वाच्या वतीने मंगळवारी येथे येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी किरण पाटील, सुनील टकले, रामा तनपुरे, बाळासाहेब सूर्यवंशी, सतिष लाघुडे, रामदास सूर्यवंशी,भगवान घोडके, कमलाकर शेटे, बबन दळवी, सलीम आतार यांची भाषणे झाली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत