शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा एकरांत जिरेनियमची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST

आंभोळ येथील मच्छिंद्र चौधरी यांनी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यातच त्यांनी पैठण येथील बंधू अनिल यांचे पंधरा ...

आंभोळ येथील मच्छिंद्र चौधरी यांनी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यातच त्यांनी पैठण येथील बंधू अनिल यांचे पंधरा एकराचे माळरान व्यवस्थित केले. या क्षेत्रात ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, या तीन गोष्टी साध्य होतील, या पद्धतीच्या पिकांची निवड ते करत होते. याच वेळी केंद्र सरकारचे अरोमा मिशन सुरू होते. या मिशनच्या माध्यमातून सुगंधी वनस्पतींचा आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोणत्या वनस्पती येतील, याचा अभ्यास केला. लखनौ येथून सुरुवातीला जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची रोपे आणली. त्यांची उगवण क्षमता चांगली असल्याचे दिसून आल्यानंतर सहा एकर क्षेत्रात जिरेनियमची लागवड केली. यानंतर लेमन ग्रास, सिट्रेनाला, वाला या वनस्पतींची लागवड केली. काही ठिकाणी ठिबक सिंचन केले आहे. पाणी व्यवस्थापनासाठी एक-दोन कोटी व वीस लाख लीटर क्षमता असणारी दोन शेततळे उभारली. पावसाळ्यात हे दोन्ही तळे भरून घेतले जातात आणि यासाठी मुळा नदीवरून उपसा सिंचन योजना राबविण्यात आली आहे. या सुगंधी वनस्पतीची लागवड यशस्वी झाल्यानंतर, तेल निर्मिती करण्याचा प्रश्न निर्माण झाला. यावरही मात करत तेल निर्मिती करण्यासाठी स्वतःच्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्लांट उभा केला. याबरोबरच आता जिरेनियमची रोपे हे स्वतः तयार करत आहेत.

.....................

तीन वर्षे मिळते उत्पन्न

या सर्व वनस्पतींपासून तीन वर्षे उत्पन्न मिळते. त्यात दर तीन ते चार महिन्यांनी याची कापणी करावी लागते. एक एकर क्षेत्रात वर्षाला किमान चाळीस टन जिरेनियमचे उत्पादन मिळते, तर एक टनच्या मालापासून एक किलो जिरेनियमचे तेल तयार होते. या तेलाला जागतिक पातळीवर मागणी होत असून, तेलाचा हमीभाव साडेबारा हजार रुपये किलो आहे. म्हणजेच एक एकर क्षेत्रात जिरेनियमपासून वर्षेला खर्च वजा जाता सुमारे तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

..................

इतर लागवड केलेल्या सुगंधी वनस्पतींच्या तेलांनाही जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. लेमन ग्रासपासून तयार करण्यात आलेले तेल पेस्टिसाइड म्हणून वापर करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत ज्याला हमीभाव असेल, अधिक दिवस साठवून ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपले उत्पादन पोहोचेल, विकेल, अशीच पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत.

- मच्छिंद्र आणि अनिल चौधरी

( २० जिरेनियम )