शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा एकरांत जिरेनियमची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST

आंभोळ येथील मच्छिंद्र चौधरी यांनी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यातच त्यांनी पैठण येथील बंधू अनिल यांचे पंधरा ...

आंभोळ येथील मच्छिंद्र चौधरी यांनी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यातच त्यांनी पैठण येथील बंधू अनिल यांचे पंधरा एकराचे माळरान व्यवस्थित केले. या क्षेत्रात ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, या तीन गोष्टी साध्य होतील, या पद्धतीच्या पिकांची निवड ते करत होते. याच वेळी केंद्र सरकारचे अरोमा मिशन सुरू होते. या मिशनच्या माध्यमातून सुगंधी वनस्पतींचा आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोणत्या वनस्पती येतील, याचा अभ्यास केला. लखनौ येथून सुरुवातीला जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची रोपे आणली. त्यांची उगवण क्षमता चांगली असल्याचे दिसून आल्यानंतर सहा एकर क्षेत्रात जिरेनियमची लागवड केली. यानंतर लेमन ग्रास, सिट्रेनाला, वाला या वनस्पतींची लागवड केली. काही ठिकाणी ठिबक सिंचन केले आहे. पाणी व्यवस्थापनासाठी एक-दोन कोटी व वीस लाख लीटर क्षमता असणारी दोन शेततळे उभारली. पावसाळ्यात हे दोन्ही तळे भरून घेतले जातात आणि यासाठी मुळा नदीवरून उपसा सिंचन योजना राबविण्यात आली आहे. या सुगंधी वनस्पतीची लागवड यशस्वी झाल्यानंतर, तेल निर्मिती करण्याचा प्रश्न निर्माण झाला. यावरही मात करत तेल निर्मिती करण्यासाठी स्वतःच्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्लांट उभा केला. याबरोबरच आता जिरेनियमची रोपे हे स्वतः तयार करत आहेत.

.....................

तीन वर्षे मिळते उत्पन्न

या सर्व वनस्पतींपासून तीन वर्षे उत्पन्न मिळते. त्यात दर तीन ते चार महिन्यांनी याची कापणी करावी लागते. एक एकर क्षेत्रात वर्षाला किमान चाळीस टन जिरेनियमचे उत्पादन मिळते, तर एक टनच्या मालापासून एक किलो जिरेनियमचे तेल तयार होते. या तेलाला जागतिक पातळीवर मागणी होत असून, तेलाचा हमीभाव साडेबारा हजार रुपये किलो आहे. म्हणजेच एक एकर क्षेत्रात जिरेनियमपासून वर्षेला खर्च वजा जाता सुमारे तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

..................

इतर लागवड केलेल्या सुगंधी वनस्पतींच्या तेलांनाही जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. लेमन ग्रासपासून तयार करण्यात आलेले तेल पेस्टिसाइड म्हणून वापर करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत ज्याला हमीभाव असेल, अधिक दिवस साठवून ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपले उत्पादन पोहोचेल, विकेल, अशीच पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत.

- मच्छिंद्र आणि अनिल चौधरी

( २० जिरेनियम )