शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

काम बंद पाडणा-यांची दादागिरी मोडीत काढू : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:49 IST

निळवंडे कालव्याचे काम विरोधकांनी ५० वर्ष झुलवत ठेवले़ युती शासनाच्या काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती आली असून उजव्या कालव्याचे एक दिवसही काम बंद पडू दिले जाणार नाही़

राहुरी : निळवंडे कालव्याचे काम विरोधकांनी ५० वर्ष झुलवत ठेवले़ युती शासनाच्या काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती आली असून उजव्या कालव्याचे एक दिवसही काम बंद पडू दिले जाणार नाही़ माथ्यावरच्या आंदोलकांचा प्रश्नही येत्या १५ दिवसात मार्गी लावला जाईल़ मात्र दादागिरी करून काम बंद पाडणा-यांची दादागिरी सरकार मोडीत काढेल, असा इशारा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिला़निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ कणगर येथे रविवारी महाजन यांच्या हस्ते झाला. तांभेरे येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते़ मंत्री महाजन पुढे म्हणाले, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे़ कामासाठी लागणारा पैसा कमी पडू दिला जाणार नाही. काँग्रेसच्या आघाडी सरकारने खरकटे ठेवलेली कामे पूर्ण करण्याचा युती सरकारने सपाटा लावला आहे़ पाणी सोडण्याचे अधिकार संबंधित अधिका-यांना दिले आहेत.मंत्र्यांच्या सभेत शेतकºयांनी झळकावले फलकमंत्री गिरीष महाजन भाषणासाठी उभे राहिले असता निळवंडेचे पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा शेतक-यांनी फलक हातात घेऊन सुरू केल्या. मंत्र्यांनी हस्तक्षेप करीत त्यासाठीच मी इथे आलो आहे़ कालव्याला कुणी आडवे आले तर वेळप्रसंगी मी काम सुरू करण्यासाठी येईल. निवडणूक आली म्हणून मी आलो नाही़ काळजी करू नका, असा दिलासा दिल्यानंतर घोषणाबाजीला पूर्णविराम मिळाला़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर