शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यात शेतक-यांना लुटणा-या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:19 IST

उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली.

राहुरी : ऊसतोडीपोटी शेतक-यांकडून चार हजार रुपये उकळणा-या तोडणी टोळीचा गुरुवारी राहुरी तालुक्यात पर्दाफाश झाला.उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली. तसेच संबंधित शेतक-याला पैसे परत मिळवून देत वादावर पडदा टाकला.पिंपळाच्या मळ्यात संदीप ढवळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना तोडणीपोटी कामगारांनी चार हजार रुपये मागितले. ढवळे यांच्या वाटेक-यांनी कामगाराच्या मुकादमाला चार हजार रुपये दिल्यानंतरही तोडणी कामगारांनी ऊस अर्धवट तोडून पळ काढला. त्यामुळे ढवळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून कारखान्याच्या अधिका-यांकडे तक्रार नोंदविली. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या पोस्टमुळे खडबडून जागे झालेल्या कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरी गाठली. मुकादमास बोलावून पैसे घेतल्याची खात्री केली. चौकशीत ऊसतोडणीपोटी चार हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. अधिका-यांनी मुकादमाकडून पैसे मागवून घेतले. याशिवाय तोडणी टोळीचे काम काढून घेतले़ राहिलेला ऊस काढून देऊ, असे सांगत अधिका-यांनी संगमनेर गाठले.ऊस जास्त झाला, अशी अफवा सोडून साखर कारखान्यांनी कमी भावात शेतक-यांकडून ऊस घेतला़ याशिवाय काही काळासाठी कारखान्यांनी टोळयाही काढून घेतल्या़ त्यामुळे भयभीत झालेल्या शेतक-यांनी शरणागती पत्करली. शेतक-यांच्या मजबुरीचा फायदा घेत ऊसतोडणी कामगारांनी बोकड, दारू व पैसे वसूल करण्यास सुरूवात केली. साखरसम्राटांचे उंबरे झिजविण्याची वेळे शेतक-यांवर आली. त्यातच रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने पाणी असतानाही उसाचे पीक कसे जगवायचे? असा प्रश्न शेतक-यांपुढे आहे.

बारा कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत

राहुरी तालुक्यात सध्या स्थानिक राहुरी, प्रसाद शुगरसह संगमनेर, अगस्ती, प्रवरा, संजीवनी, कोळपेवाडी, कोळपेवाडी, अशोकनगर, युटेक, दौंड शुगर, अंबालिका, श्रीगोंदा अशा बारा साखर कारखान्यांच्या टोळया कार्यरत आहेत. राहुरी कारखाना सुरू झाल्यानंतर बाहेरील साखर कारखान्यांना ऊस जाऊ देणार नाही, अशी गर्जना तनपुरे कारखान्याचे सूत्रधार डॉ. सुजय विखे यांनी केली होती. त्यानंतर बाहेरील कारखान्यांनी टोळ्या काढून घेतल्या. अल्प प्रमाणावर टोळ्या कार्यरत राहिल्याने आपला ऊस जाणार का? याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी