शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

राहुरी तालुक्यात शेतक-यांना लुटणा-या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:19 IST

उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली.

राहुरी : ऊसतोडीपोटी शेतक-यांकडून चार हजार रुपये उकळणा-या तोडणी टोळीचा गुरुवारी राहुरी तालुक्यात पर्दाफाश झाला.उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली. तसेच संबंधित शेतक-याला पैसे परत मिळवून देत वादावर पडदा टाकला.पिंपळाच्या मळ्यात संदीप ढवळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना तोडणीपोटी कामगारांनी चार हजार रुपये मागितले. ढवळे यांच्या वाटेक-यांनी कामगाराच्या मुकादमाला चार हजार रुपये दिल्यानंतरही तोडणी कामगारांनी ऊस अर्धवट तोडून पळ काढला. त्यामुळे ढवळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून कारखान्याच्या अधिका-यांकडे तक्रार नोंदविली. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या पोस्टमुळे खडबडून जागे झालेल्या कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरी गाठली. मुकादमास बोलावून पैसे घेतल्याची खात्री केली. चौकशीत ऊसतोडणीपोटी चार हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. अधिका-यांनी मुकादमाकडून पैसे मागवून घेतले. याशिवाय तोडणी टोळीचे काम काढून घेतले़ राहिलेला ऊस काढून देऊ, असे सांगत अधिका-यांनी संगमनेर गाठले.ऊस जास्त झाला, अशी अफवा सोडून साखर कारखान्यांनी कमी भावात शेतक-यांकडून ऊस घेतला़ याशिवाय काही काळासाठी कारखान्यांनी टोळयाही काढून घेतल्या़ त्यामुळे भयभीत झालेल्या शेतक-यांनी शरणागती पत्करली. शेतक-यांच्या मजबुरीचा फायदा घेत ऊसतोडणी कामगारांनी बोकड, दारू व पैसे वसूल करण्यास सुरूवात केली. साखरसम्राटांचे उंबरे झिजविण्याची वेळे शेतक-यांवर आली. त्यातच रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने पाणी असतानाही उसाचे पीक कसे जगवायचे? असा प्रश्न शेतक-यांपुढे आहे.

बारा कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत

राहुरी तालुक्यात सध्या स्थानिक राहुरी, प्रसाद शुगरसह संगमनेर, अगस्ती, प्रवरा, संजीवनी, कोळपेवाडी, कोळपेवाडी, अशोकनगर, युटेक, दौंड शुगर, अंबालिका, श्रीगोंदा अशा बारा साखर कारखान्यांच्या टोळया कार्यरत आहेत. राहुरी कारखाना सुरू झाल्यानंतर बाहेरील साखर कारखान्यांना ऊस जाऊ देणार नाही, अशी गर्जना तनपुरे कारखान्याचे सूत्रधार डॉ. सुजय विखे यांनी केली होती. त्यानंतर बाहेरील कारखान्यांनी टोळ्या काढून घेतल्या. अल्प प्रमाणावर टोळ्या कार्यरत राहिल्याने आपला ऊस जाणार का? याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी