शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

गांधींचा भाजप राष्ट्रवादीच्या दावणीला : अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:45 IST

नगरमधील भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी व काँगे्रस पुरस्कृत पार्टी आहे, हे केडगावमध्ये उघड झाले आहे. या तिघांची शिवसेनेविरोधात छुपी युती आहे. 

अहमदनगर : नगरमधील भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी व काँगे्रस पुरस्कृत पार्टी आहे, हे केडगावमध्ये उघड झाले आहे. या तिघांची शिवसेनेविरोधात छुपी युती आहे. गांधींचा भाजप पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.गुरुवारी (दि़२९) ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवरुन राठोड यांची लाईव्ह मुलाखत घेण्यात आली. ‘लोकमत’ टीमने व फेसबुकवर नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना राठोड यांनी दिलखुलास उत्तरे दिली.ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचा नारळ फोडलाय. हा नारळ फोडताना महापौर द्या तरच तीनशे कोटी देतो, असे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जाहीर करतात. हे मतदारांना त्यांनी दाखवलेले आमिष आहे. तुम्हाला द्यायचेच होते तर यापूर्वी का नाही निधी दिला. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. मग यापूर्वी निधी देण्यासाठी कोणी अडवले होते का? ठाण्यात, कल्याणमध्ये तुम्ही असेच निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तेथे निधी दिला का? हे पोकळ आश्वासन नगरला नकोय. तुमचे पालकमंत्री, खासदार नगरच्या उड्डाणपुलाबाबत अनेकदा २००-२५० कोटी आणल्याचे सांगत होते. मग पुलाचे काम का नाही केले, नगरला भाजपाने काय दिले, किती निधी शहरासाठी दिला, कोणत्या योजना आणल्या, हे जाहीर करावे. तुम्ही मागील साडेचार वर्षात काहीच केले नाही. फक्त शहराची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे तुम्ही आता थापा मारणे बंद करा. तुम्ही शहराचा बिहार केला. आम्ही नगर शहर भयमुक्त केले. राष्ट्रवादी ज्यापद्धतीने काम करीत आहेत, त्याचपद्धतीने भाजप काम करीत आहे. ही भाजप पार्टी आम्हाला मान्य नाही. ही बनावट पार्टी आहे. खरे भाजपवाले यांच्यावर नाराज आहेत. नगरमध्ये सोयऱ्या-धाय-यांचे राजकारण सुरु आहे. ते अत्यंत घातक आहे़. हे लोकांच्या लक्षात आले आहे.पंधाडे, डागवाले निष्ठावान नव्हतेच...अंबादास पंधाडे, डागवाले यांसारखे निष्ठावान शिवसेनेला सोडून का गेले, असा प्रश्न विचारला असता राठोड म्हणाले, ते एका पक्षात कधीच टिकले नाहीत. त्यांच्या काही गरजा भागविण्यासाठी ते तिकडे गेले. ते गद्दार आहेत. त्यांना निष्ठावान कसे म्हणता येईल. त्यांची मला प्रश्न विचारण्याची ताकद नाही. बाळासाहेब बोराटे यांनी गतवेळी शिवसेनेला फसवल्यानंतरही त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले याकडे लक्ष वेधले असता राठोड म्हणाले, काहीजण शिवसेना सोडून गेले़ त्याचे फळ त्यांना मिळाले. त्यामुळे ते पुन्हा आमच्याकडे आले. लोकांचे विचार बदलत राहतात. कार्यकर्ते ज्याची मागणी करतात, त्याला आम्ही तिकीट देतो.‘ये रिश्ता क्या कहलाता हैजेथे राष्टÑवादीचे उमेदवार आहेत तेथे भाजपने कमजोर उमेदवार दिले आहेत व जेथे भाजपचे उमेदवार आहेत तेथे राष्टÑवादीने कमजोर उमेदवार दिले आहेत. ही सर्व मॅच फिक्सिंग आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हे लोक ओळखून असल्याचे राठोड म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका