शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गांधींचा भाजप राष्ट्रवादीच्या दावणीला : अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:45 IST

नगरमधील भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी व काँगे्रस पुरस्कृत पार्टी आहे, हे केडगावमध्ये उघड झाले आहे. या तिघांची शिवसेनेविरोधात छुपी युती आहे. 

अहमदनगर : नगरमधील भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी व काँगे्रस पुरस्कृत पार्टी आहे, हे केडगावमध्ये उघड झाले आहे. या तिघांची शिवसेनेविरोधात छुपी युती आहे. गांधींचा भाजप पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.गुरुवारी (दि़२९) ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवरुन राठोड यांची लाईव्ह मुलाखत घेण्यात आली. ‘लोकमत’ टीमने व फेसबुकवर नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना राठोड यांनी दिलखुलास उत्तरे दिली.ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचा नारळ फोडलाय. हा नारळ फोडताना महापौर द्या तरच तीनशे कोटी देतो, असे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जाहीर करतात. हे मतदारांना त्यांनी दाखवलेले आमिष आहे. तुम्हाला द्यायचेच होते तर यापूर्वी का नाही निधी दिला. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. मग यापूर्वी निधी देण्यासाठी कोणी अडवले होते का? ठाण्यात, कल्याणमध्ये तुम्ही असेच निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तेथे निधी दिला का? हे पोकळ आश्वासन नगरला नकोय. तुमचे पालकमंत्री, खासदार नगरच्या उड्डाणपुलाबाबत अनेकदा २००-२५० कोटी आणल्याचे सांगत होते. मग पुलाचे काम का नाही केले, नगरला भाजपाने काय दिले, किती निधी शहरासाठी दिला, कोणत्या योजना आणल्या, हे जाहीर करावे. तुम्ही मागील साडेचार वर्षात काहीच केले नाही. फक्त शहराची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे तुम्ही आता थापा मारणे बंद करा. तुम्ही शहराचा बिहार केला. आम्ही नगर शहर भयमुक्त केले. राष्ट्रवादी ज्यापद्धतीने काम करीत आहेत, त्याचपद्धतीने भाजप काम करीत आहे. ही भाजप पार्टी आम्हाला मान्य नाही. ही बनावट पार्टी आहे. खरे भाजपवाले यांच्यावर नाराज आहेत. नगरमध्ये सोयऱ्या-धाय-यांचे राजकारण सुरु आहे. ते अत्यंत घातक आहे़. हे लोकांच्या लक्षात आले आहे.पंधाडे, डागवाले निष्ठावान नव्हतेच...अंबादास पंधाडे, डागवाले यांसारखे निष्ठावान शिवसेनेला सोडून का गेले, असा प्रश्न विचारला असता राठोड म्हणाले, ते एका पक्षात कधीच टिकले नाहीत. त्यांच्या काही गरजा भागविण्यासाठी ते तिकडे गेले. ते गद्दार आहेत. त्यांना निष्ठावान कसे म्हणता येईल. त्यांची मला प्रश्न विचारण्याची ताकद नाही. बाळासाहेब बोराटे यांनी गतवेळी शिवसेनेला फसवल्यानंतरही त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले याकडे लक्ष वेधले असता राठोड म्हणाले, काहीजण शिवसेना सोडून गेले़ त्याचे फळ त्यांना मिळाले. त्यामुळे ते पुन्हा आमच्याकडे आले. लोकांचे विचार बदलत राहतात. कार्यकर्ते ज्याची मागणी करतात, त्याला आम्ही तिकीट देतो.‘ये रिश्ता क्या कहलाता हैजेथे राष्टÑवादीचे उमेदवार आहेत तेथे भाजपने कमजोर उमेदवार दिले आहेत व जेथे भाजपचे उमेदवार आहेत तेथे राष्टÑवादीने कमजोर उमेदवार दिले आहेत. ही सर्व मॅच फिक्सिंग आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हे लोक ओळखून असल्याचे राठोड म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका