शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे भविष्य अंगणवाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 00:15 IST

अहमदनगर : गाव, वाड्या- वस्त्यांवर जाऊन अंगणवाडी सेविका काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडत आहे.

अहमदनगर : गाव, वाड्या- वस्त्यांवर जाऊन अंगणवाडी सेविका काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडत आहे. देशाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असल्याचे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. जिल्हा परिषद महिला-बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील १४६ अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि मदतनीस यांचा मंगळवारी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे होत्या. खा. सुळे म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांना वाड्या- वस्त्यांवर जाऊन ग्राऊं ड पातळीवर काम कराव लागते. हे काम करत असताना त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या मानधनात वाढ होणे गरजेचे आहे. त्यांना विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेसंदर्भात सुळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेची ताकद मोठी आहे. ग्रामीण भागात शेवटच्या घटकापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करता येते. ज्यांना राजकारणात चांगले काम करायचे आहे, त्यांनी जिल्हा परिषदेत काम करावे, असे त्यांनी सूचवले. महिलांना पंचायत राजमध्ये ५० टक्के आरक्षण मिळालेले आहे. यापेक्षा अधिक आरक्षणाची मागणी महिला करणार नाहीत. राजकारणात महिलांना आरक्षण मिळाल्याने मोठा बदल झाला नसला तरी त्या दिशेने सुरुवात झाली आहे. महिला आरक्षणामुळे सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. विखे यांनी महिला स्वत: संघर्ष करत त्यांच्या अडचणींवर मात करतात. जिल्हा परिषदेच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली असल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला देशात दुसरा आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. आता जिल्हा परिषद राज्यात तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली. प्रास्ताविक महिला बालकल्याणच्या सभापती नंदा वारे यांनी केले. यात महिला बालकल्याण विभागाने राबवलेल्या विविध योजना, कुपोषण मुक्तीसाठी झालेले प्रयत्न, अंगणवाडी इमारतींच्या सद्यस्थितीची माहिती दिली. अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी शरद पवार यांच्यामुळे महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, मीरा चकोर आणि सदस्य उपस्थित होते. आभार महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी मानले. सूत्रसंचालन वैशाली कुकडे यांनी केले. १४६ सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.(प्रतिनिधी)अध्यक्षा गुंड यांनी आपल्या भाषणात आरक्षणामुळे त्यांच्या पतीराजांना व्यासपीठासमोर बसण्याची वेळ आली, असे भाष्य केले. खा. सुळे यांनी आपल्या भाषणात गुंड यांच्या वक्तव्याचा धागा पकडत महिलांनाच संवेदना अधिक असतात. यामुळेच आपल्या पतीला राजकारणात आपल्यामुळे समोर बसावे लागले, याचे दु:ख होते, असे सांगितले.