शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

देशाचे भविष्य अंगणवाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 00:15 IST

अहमदनगर : गाव, वाड्या- वस्त्यांवर जाऊन अंगणवाडी सेविका काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडत आहे.

अहमदनगर : गाव, वाड्या- वस्त्यांवर जाऊन अंगणवाडी सेविका काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडत आहे. देशाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असल्याचे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. जिल्हा परिषद महिला-बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील १४६ अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि मदतनीस यांचा मंगळवारी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे होत्या. खा. सुळे म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांना वाड्या- वस्त्यांवर जाऊन ग्राऊं ड पातळीवर काम कराव लागते. हे काम करत असताना त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या मानधनात वाढ होणे गरजेचे आहे. त्यांना विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेसंदर्भात सुळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेची ताकद मोठी आहे. ग्रामीण भागात शेवटच्या घटकापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करता येते. ज्यांना राजकारणात चांगले काम करायचे आहे, त्यांनी जिल्हा परिषदेत काम करावे, असे त्यांनी सूचवले. महिलांना पंचायत राजमध्ये ५० टक्के आरक्षण मिळालेले आहे. यापेक्षा अधिक आरक्षणाची मागणी महिला करणार नाहीत. राजकारणात महिलांना आरक्षण मिळाल्याने मोठा बदल झाला नसला तरी त्या दिशेने सुरुवात झाली आहे. महिला आरक्षणामुळे सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. विखे यांनी महिला स्वत: संघर्ष करत त्यांच्या अडचणींवर मात करतात. जिल्हा परिषदेच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली असल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला देशात दुसरा आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. आता जिल्हा परिषद राज्यात तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली. प्रास्ताविक महिला बालकल्याणच्या सभापती नंदा वारे यांनी केले. यात महिला बालकल्याण विभागाने राबवलेल्या विविध योजना, कुपोषण मुक्तीसाठी झालेले प्रयत्न, अंगणवाडी इमारतींच्या सद्यस्थितीची माहिती दिली. अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी शरद पवार यांच्यामुळे महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, मीरा चकोर आणि सदस्य उपस्थित होते. आभार महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी मानले. सूत्रसंचालन वैशाली कुकडे यांनी केले. १४६ सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.(प्रतिनिधी)अध्यक्षा गुंड यांनी आपल्या भाषणात आरक्षणामुळे त्यांच्या पतीराजांना व्यासपीठासमोर बसण्याची वेळ आली, असे भाष्य केले. खा. सुळे यांनी आपल्या भाषणात गुंड यांच्या वक्तव्याचा धागा पकडत महिलांनाच संवेदना अधिक असतात. यामुळेच आपल्या पतीला राजकारणात आपल्यामुळे समोर बसावे लागले, याचे दु:ख होते, असे सांगितले.