शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

साखर हंगामाची भट्टी पेटली; १०० टक्के एफआरपी अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:07 IST

अहमदनगर जिल्ह्यात खाजगी व सहकारी अशा प्रकारचे एकूण २३ साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातील २२ कारखान्यांना साखर आयुक्तांनी ऊस गाळप परवाना दिलेला आहे. हिरडगाव येथील साईकृपा या खाजगी कारखान्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामास सुरूवात आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची भट्टी पेटली आहे.दसºयापासूनच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा बॉयलर पेटण्यास सुरूवात झाली आहे.अहमदनगर जिल्ह्यात खाजगी व सहकारी अशा प्रकारचे एकूण २३ साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातील २२ कारखान्यांना साखर आयुक्तांनी ऊस गाळप परवाना दिलेला आहे. हिरडगाव येथील साईकृपा या खाजगी कारखान्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही. या कारखान्याने देखील गाळपासाठी आयुक्तांकडे परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे या हंगामात जिल्ह्यातील हे सर्व २३ कारखाने सुरू होणार आहेत. आतापर्यंत अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना, लोणीचा पद्मश्री विखे सहकारी साखर कारखाना, विखे कारखान्याने भागिदारी तत्वावर चालविण्यासाठी घेतलेला राहाता तालुक्यातील गणेश, राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना, प्रसाद खाजगी कारखाना, नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर व मुळा सहकारी साखर कारखाना, संगमनेरचा थोरात सहकारी कारखाना, कोपरगावचा संजीवनी व काळे सहकारी कारखाना, पाथर्डीचा वृद्धेश्वर सहकारी कारखाना, पारनेरचा भाडे तत्वावरील क्रांती शुगर, जामखेडचा अंबालिका, जय श्रीराम, श्रीगोंदा तालुुक्यातील साईकृपा-१ (देवदैठण), शेवगाव तालुक्यातील गंगामाई खाजगी कारखाना यांचा बॉयलर पेटला आहे. रविवार १५ आॅक्टोबरला श्रीगोंदा सहकारी कारखाना, भाडे तत्वावरील नगर तालुक्यातील पियुष या कारखान्यांचा बॉयलर पेटणार आहे.

१०० टक्के एफ. आर. पी. अदा

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व २३ साखर कारखान्यांनी सरकारी निर्देशांप्रमाणे त्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकरी सभासदांना उसाची किमान आधारभूत किंमत (एफ. आर.पी.) पूर्णपणे अदा केली आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतक-यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम थकविल्याने या कारखान्यावर जप्तीची नामुष्की ओढावली होती. पण या कारखान्यानेसुद्धा थकबाकी अदा केली आहे. त्यामुळे हा कारखाना या हंगामात उसाचे गाळप करण्यास सज्ज झाला असून त्यासाठी त्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

आणखी दोन खाजगी कारखाने

जिल्ह्यात साखर कारखाने उदंड झाले असताना आणखी दोन नवीन खाजगी साखर कारखान्यांची यात भर पडणार आहे. एक कारखाना संगमनेर तालुक्यात होत असून दुसरा कारखाना नेवासा तालुक्यात होत आहे. संगमनेरच्या कारखान्याच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर