शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

एफआरपीचा ८०-२० फॉर्म्युला अमान्य :रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:56 IST

कायद्याची मोडतोड करून भाजप सरकार व साखर कारखानदार एकरकमी एफआरपीचे तुकडे करून ८० टक्के आधी व २० टक्के पैसे नंतर देण्याचा एफआरपीचा ८०-२० असा नवीन फॉर्म्युला आणू पाहत आहेत.

रमेश शिंदेपाचेगाव : कायद्याची मोडतोड करून भाजप सरकार व साखर कारखानदार एकरकमी एफआरपीचे तुकडे करून ८० टक्के आधी व २० टक्के पैसे नंतर देण्याचा एफआरपीचा ८०-२० असा नवीन फॉर्म्युला आणू पाहत आहेत. त्यास आमचा विरोध आहे. या एफआरपी फॉर्म्युलाला ऊस पट्टयातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करावा. शेतकरी विरोधात हे सरकार वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहे. काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना पर्याय म्हणून शेतकरी संघटना महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका लढविणार आहे, असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे शेतक-यांच्या बैठकीसाठी जाताना ते शुक्रवारी नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाटा येथे शेतकºयांच्या आग्रहास्तव थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, शिवाजीनाना नांदखिले हे नेते उपस्थित होते.‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, शेतक-यांच्या संमतीशिवाय ऊस बिलाच्या रकमेतून कर्जवसुली होता कामा नये. होणारी वसुली जिल्ह्यातील कारखान्यांनी थांबविली पाहिजे. काँग्रेस सरकारने शेतकरीविरोधी धोरणे, कायदे केले. आताचे भाजप सरकार ते राबविण्याचे प्रयत्न करीत आहे. १०० टक्के एफआरपीसाठी कारखानदार व सरकार विरोधात शेतकºयांनी लढा उभारावा. महाराष्ट्रातील दरवर्षी पडणारे दुष्काळ हे काँग्रेस व भाजप सरकारचा नाकर्तेपणा आहे. साखर कारखाने, बाजार समिती, दूध संघ यांच्यावर कोणतीही कारवाई राज्य सरकारकडून होत नाही, याचा अर्थ असा आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजप-शिवसेना सरकारला छुपा पाठिंबा आहे. यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही शेतक-यांसाठी पर्याय उभा करणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यात शेतकºयांच्या उसाच्या एफआरपीच्या रकमेचे तुकडे करू पाहणारे शेतक-यांच्या नावाने चळवळ उभी करू पाहत आहे. हे नेते गवतातील हिरवे साप आहेत, अशी टीका पाटील यांनी अनिल घनवट यांचे नाव न घेता यावेळी केली. रघुनाथदादा पाटील यांचा नेवासा तालुक्यातील शेतक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे नेवासा तालुकाप्रमुख हरिभाऊ तुवर, संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव तुवर, भास्कर तुवर, कैलास पवार, भगीरथ पवार, कर्णासाहेब तुवर, अभय तुवर आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर