शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

वाळकी येथील पियुश शुगर कारखान्यासमोर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:37 IST

नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

केडगाव : नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन चोभे यांनी आंदोलनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पाण्याअभावी नगर तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळेच येथील पियुश शुगर हा खासगी साखर कारखाना नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी व पाथर्डी आदी तालुक्यातील उसावर चालविला जातो. मात्र, यंदा या कारखान्याने मागील वर्षी २५०० रुपयांचा भाव दिला होता. यंदाही मागील वर्षीपेक्षा किमान ५० रुपये जादा भाव देण्याचे आश्वासन देऊन ऊस आणला होता. मात्र, आता फक्त २२०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच ४८ दिवसांपासूनचे पेमेंटही कारखान्याने जमा केलेले नाही. त्यामुळेच १५ दिवसांत पैसे जमा न करून या कारखान्याने शेतकरी बांधवांची फसवणूक केली आहे. याच फसवणुकीमुळे साखर संचालनालयाने या कारखान्यावर नियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र, सत्ताधारी भाजपा नेत्यांच्या वरदहस्ताने चालणा-या या कारखान्यालाच साखर आयुक्तालयाने अभय दिले आहे. सरकारी कृपेने मोकळे रान मिळाल्यानेच हा कारखाना शेतक-यांची पिळवणूक करीत आहे. याविरोधात उग्र आंदोलन पुकारतानाच प्रसंगी गव्हाणीत आत्मदहन करण्याचीही शेतकरी बांधवांची भावना आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्यांच्या पक्षाच्या छत्रछायेखाली सुरू असलेल्या कारखान्याच्या फसवणुकीबद्दल कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी रविंद्र आगळे यांनी केली आहे. यावेळी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, विजय निकम, संदीप लंघे, अनिल पोटे, सतिश पोटे, महेश कदम, दत्तात्रय लांडे, विनोद पोटे, अरुण देशमुख, बाबासाहेब निकम, बाबासाहेब वाकळे, आंबादास घुले यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

...तर आंदोलन पेटेल : दहातोंडे

संभाजी दहातोंडे म्हणाले, शेतक-यांवर अन्याय होत असतानाही सरकार व प्रशासन ढिम्म आहे. परिणामी पियुश शुगर कारखान्याकडून शेतक-यांची लूट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. यावर तातडीने न्याय न दिल्यास हेच आंदोलन हिंसक होईल. याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील.

कारखान्यावर गुन्हा दाखल करा : चोभे

सचिन चोभे म्हणाले की, कारखाना प्रशासन उतारा कमी येत असल्याचे कारण देऊन लूट करीत आहे. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. तसेच १५ दिवसांत पेमेंटही जमा केलेले नाही. त्यामुळेच याप्रकरणी साखर आयुक्तांनी कमी उतारा येण्याच्या प्रकरणाची चौकशी करावी व शेतक-यांची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने