शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मिडसांगवीत ५२ कोंबड्या दगावल्याने घबराट; बर्ड फ्लूच्या अनुषंगाने प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:45 IST

पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे पाच पशुपालकांच्या सुमारे ५२ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने पशुपालकांत घबराट पसरली आहे. राज्यातील काही भागात बर्ड फ्लूची साथ पसरल्याने प्रशासन सतर्क झाले असून, प्रतिबंध व खबरदारीसाठी पशुसंवर्धन विभागाने ७८ पथकांची स्थापना केली आहे.

अहमदनगर / तीसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे पाच पशुपालकांच्या सुमारे ५२ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने पशुपालकांत घबराट पसरली आहे. राज्यातील काही भागात बर्ड फ्लूची साथ पसरल्याने प्रशासन सतर्क झाले असून, प्रतिबंध व खबरदारीसाठी पशुसंवर्धन विभागाने ७८ पथकांची स्थापना केली आहे.

मिडसांगवी येथे सहादू युसूफ शेख, दिलावर बादशहा शेख, शफीक चंदूभाई शेख, जावेद युसूफ शेख व सलीम दादाभाई शेख या पशुपालकांनी खुल्या पद्धतीने कुक्कुटपालन केले असून, गेल्या दोन दिवसांत त्यांच्याकडील ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यामुळे सोमवारी पाथर्डीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश पालवे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. काही मृत कोंबड्या ताब्यात घेऊन त्या उत्तरीय तपासणीसाठी अहमदनगर येथे व नंतर भोपाळ येथील केंद्रीय तपासणी केंद्रात पाठविल्या जाणार आहेत. तपासणीअंती कोंबड्या दगावण्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती डॉ. पालवे यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची नोंद झाली नसली तरी इतर जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या घटना आढळल्याने जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ७८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात सोमवारी पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली.

    उपवन संरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंभारे, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी. एन. शेळके, पशुसर्वचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात १ कोटी १४ लाख कोंबड्या

सध्या जिल्ह्यात ३ हजार ३४१ पोल्ट्री फार्मस् असून, त्यात १ कोटी १४ लाख पक्षी आहेत. पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाची लक्षणे आढळल्‍यास पशुपालकांनी नजीकच्‍या पशुवैद्यकीय दवाखान्‍याशी संपर्क साधावा. रोजची स्‍वच्‍छता व निर्जंतुकीकरण करावे. स्थलांतरित पक्षी ज्‍या भागात येतात, त्‍या भागामध्‍ये व्‍यापक सर्वेक्षण मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.

श्रीगोंद्यात कबूतर, कावळ्याचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यात ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्यानंतर सोमवारीच श्रीगोंदे शहरात एक कबूतर, तर भानगाव (ता. श्रीगोंदा) येथे एका कावळ्याचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने या पक्ष्यांचे नमुने ताब्यात घेतले असून, ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंभारे यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी आकाशात पृथ्वीच्या पृ्ष्ठभागावर धुमकेतू आदळल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकषर्णाने त्याचे तुकडे झाले. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून, त्याचा परिणाम पृथ्वीवरील जीव, प्राणीमात्रांवरही होत आहे. त्यातूनही पक्षी किंवा जनावरे दगावण्याचे प्रकार होत असण्याची शक्यता आहे.

- सुधाकर केदारी, भूगर्भ अभ्यासक, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीBird Fluबर्ड फ्लू