शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: भाजीवर तऱ्ही अन् तेला-तुपातील पोळी असेल, तर जेवणाची मजाच और असते. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: भाजीवर तऱ्ही अन् तेला-तुपातील पोळी असेल, तर जेवणाची मजाच और असते. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि रुचकर होत असले, तरी तेलाचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरत आहे. हॉटेलमध्ये बहुतांशी वेळा तेलाचा वारंवार वापर करून पदार्थ तळले जातात. घरीही उरलेल्या तेलाचा फोडणी अथवा इतर पदार्थासाठी वापर केला जातो. तेलाचा असा वापर म्हणजे विविध आजारांना आमंत्रण असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनविले गेले, तर अशा तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, तसेच ॲसिडिटी, डायबेटिस, आतड्याचे आजार, पोटात गॅस होणे असे आजारही उद्भवण्याची शक्यता असते. स्नॅक्स सेंटर, तसेच रस्त्यांवरील छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये जिलेबी, वडापाव, भजी, चायनीज, पावभाजी, मिसळ आदी पदार्थ ग्राहक चवीने खातात. बहुतांशी हॉटेल चालक मात्र तेलाचा वारंवार वापरून करून पदार्थ तयार करतात. अशा हॉटेल चालकांवर अन्न, औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

---------------

रस्त्यावरचे न खाल्लेलेच बरे

रस्त्यावरील स्टॉल, स्नॅक्स सेंटरवर खाद्यपदार्थ तयार करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. स्वच्छता ठेवली जात नाही. सध्या कोरोनासह साथीचे आजारही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पदार्थ न खाणेच चांगले आहे.

----------------------------

मोठ्या हॉटेलमध्ये तेलाचा वारंवार वापर होत नाही. मात्र, रस्त्यावरील छोटी हॉटेल्स, स्टॉल यावर असा प्रकार घडतो. अन्न, औषध प्रशासनाच्या वतीने तपासणी मोहीम सुरू आहे. कुठेही तेलाचा परत वापर केल्याचे आढळून आले, तर संबंधिताचा परवाना रद्द करणे, दंड अशा स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे हॉटेल चालकांनी ग्राहकांना स्वच्छ व शुद्ध अन्नपदार्थ द्यावेत.

- एस.पी. शिंदे, सहायक आयुक्त अन्न, औषध प्रशासन

----------------------------

हॉटेलसह घरीही बहुतांशी वेळा विविध खाद्यपदार्थ तयार करताना एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरले जाते. ही बाब आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे ॲसिडिटी, हृदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार, घशाची जळजळ, आतड्यांना सूज येणे, पोटात गॅस होणे, ब्रेस्ट कॅन्सर आदी आजार बळवण्याचा धोका असतो. तेलाचा पुन्हा वापर ही बचत नसून, आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे बाहेर खाताना आणि घरी पदार्थ तयार करताना प्रत्येकाने काळजी घ्यावी.

- डॉ.सतीश सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ

---------------------