शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: भाजीवर तऱ्ही अन् तेला-तुपातील पोळी असेल, तर जेवणाची मजाच और असते. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: भाजीवर तऱ्ही अन् तेला-तुपातील पोळी असेल, तर जेवणाची मजाच और असते. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि रुचकर होत असले, तरी तेलाचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरत आहे. हॉटेलमध्ये बहुतांशी वेळा तेलाचा वारंवार वापर करून पदार्थ तळले जातात. घरीही उरलेल्या तेलाचा फोडणी अथवा इतर पदार्थासाठी वापर केला जातो. तेलाचा असा वापर म्हणजे विविध आजारांना आमंत्रण असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनविले गेले, तर अशा तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, तसेच ॲसिडिटी, डायबेटिस, आतड्याचे आजार, पोटात गॅस होणे असे आजारही उद्भवण्याची शक्यता असते. स्नॅक्स सेंटर, तसेच रस्त्यांवरील छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये जिलेबी, वडापाव, भजी, चायनीज, पावभाजी, मिसळ आदी पदार्थ ग्राहक चवीने खातात. बहुतांशी हॉटेल चालक मात्र तेलाचा वारंवार वापरून करून पदार्थ तयार करतात. अशा हॉटेल चालकांवर अन्न, औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

---------------

रस्त्यावरचे न खाल्लेलेच बरे

रस्त्यावरील स्टॉल, स्नॅक्स सेंटरवर खाद्यपदार्थ तयार करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. स्वच्छता ठेवली जात नाही. सध्या कोरोनासह साथीचे आजारही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पदार्थ न खाणेच चांगले आहे.

----------------------------

मोठ्या हॉटेलमध्ये तेलाचा वारंवार वापर होत नाही. मात्र, रस्त्यावरील छोटी हॉटेल्स, स्टॉल यावर असा प्रकार घडतो. अन्न, औषध प्रशासनाच्या वतीने तपासणी मोहीम सुरू आहे. कुठेही तेलाचा परत वापर केल्याचे आढळून आले, तर संबंधिताचा परवाना रद्द करणे, दंड अशा स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे हॉटेल चालकांनी ग्राहकांना स्वच्छ व शुद्ध अन्नपदार्थ द्यावेत.

- एस.पी. शिंदे, सहायक आयुक्त अन्न, औषध प्रशासन

----------------------------

हॉटेलसह घरीही बहुतांशी वेळा विविध खाद्यपदार्थ तयार करताना एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरले जाते. ही बाब आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे ॲसिडिटी, हृदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार, घशाची जळजळ, आतड्यांना सूज येणे, पोटात गॅस होणे, ब्रेस्ट कॅन्सर आदी आजार बळवण्याचा धोका असतो. तेलाचा पुन्हा वापर ही बचत नसून, आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे बाहेर खाताना आणि घरी पदार्थ तयार करताना प्रत्येकाने काळजी घ्यावी.

- डॉ.सतीश सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ

---------------------