शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी कालव्यावर चोवीस तास पहारा

By admin | Updated: April 18, 2016 00:34 IST

अहमदनगर : कुकडी प्रकल्पातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे उद्भव भरण्यासाठी शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आवर्तन सोडण्यात आले़

अहमदनगर : कुकडी प्रकल्पातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे उद्भव भरण्यासाठी शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आवर्तन सोडण्यात आले़ कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले असून, कालवा परिसरात पोलीस, महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची करडी नजर असणार आहे़ नियंत्रण ठेवण्यासाठी १३ पथके नियुक्त करण्यात आले आहेत़ त्यामुळे कालव्याला छावणीचे स्वरुप आले आहे़दक्षिण नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत़ त्यामुळे जामखेड शहराला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तलावातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता़ दक्षिण नगर जिल्ह्यासाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे़ मागील आठवड्यात कुकडीतून आवर्तन सुटणार असल्याची चर्चा होती़ मात्र, आठ दिवसानंतर काल शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुकडी प्रकल्पातून एक हजार क्युसेक वेगाने कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे़ पाणी रविवारी दुपारी पारनेर तालुक्यातील अळकुटी गावात दाखल झाले असून, ते पाणी श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील तलाव भरण्यासाठी सुरूच राहणार आहे़ एकूण २२ दिवसांचे हे आवर्तन असून, त्यातून दक्षिण नगर जिल्ह्यातील ३० तलाव भरले जाणार आहेत़ त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ पिण्याबरोबरच फळबागांसाठी पाणी देण्याची या भागातील लोकप्रतिनिधींची सुरुवातीपासूनच मागणी आहे़ श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या फळबागा आहेत़ त्यासाठी कालव्यातून शेतकरी पाण्याच्या उपसा करण्याची शक्यता आहे़ पाण्याचा अवैध उपसा होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे़ कालवा परिसरात चोवीस तास पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात आला आहे़ राज्य राखीव दलाच्या तुकड्या कालवा परिसरात दाखल झाल्या असून, पाण्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)