शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेतून मंत्र्यांना पाठविली चार हजार पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST

अहमदनगर : दुधाला एमआरपीप्रमाणे दर मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तालुक्यातून चार पत्रे ...

अहमदनगर : दुधाला एमआरपीप्रमाणे दर मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तालुक्यातून चार पत्रे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लेटर टू डेअरी मिनिस्टर हे अभिनव आंदोलन हाती घेण्यात आले आहे. समितीच्या या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. एकट्या अकोले तालुक्यातून मुख्यमंत्र्यांसह दुग्धविकास मंत्र्यांना चार हजार पत्र पाठवून दुूध उत्पादकांच्या मागण्यांची माहिती देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील संगमनेर, नेवासा तालुक्यासह पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद जिल्ह्यातूनदेखील पत्र पाठविण्यात आलेली आहेत. याशिवाय विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांनाही साडेचार पत्र पाठविण्यात आली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे दुधाचे खरेदीदार आता काही प्रमाणात सुधारत आहेत. मात्र असे असले तरी दूध व्यवसायातील अस्थिरता दूध व्यावसायिकांना पुन्हा अडचणीत आणू शकते. दूध व्यवसायातील अस्थिरता लक्षात घेता संघर्ष समितीने आपल्या धोरणात्मक मागण्यांसाठीचा संघर्ष नेटाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच संघर्ष समितीच्या राज्य समन्वय समितीची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे, असेही नवले यांनी म्हटले आहे.

....

लॉकडाऊनपूर्वीचा भाव द्या

कोरोनाच्या लॉकडाऊनपूर्वी दुधाला प्रतिलीटर ३५ रुपये दर मिळत होता. लॉकडाऊन काळात हा दर २० रुपयांवर आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या घडामोडी शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दूध दरात वाढ होऊन सध्या २७-२८ रुपये भाव मिळत आहे. दुधाचे संघटीतरित्या भाव पाडले जात आहेत. मात्र, त्याला काही प्रमाणात आळा बसलेला आहे. दुधाला ३५ रुपयांपेक्षा अधिक भाव मिळालाच पाहिजे, यासाठी संघटनेचा लढा सुरुच राहणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वय डॉ. अजित नवले यांनी सांगितले.