शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

चार चिमुकल्यांचा विजेच्या धक्क्याने ओढवला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 06:26 IST

खंदरमाळ परिसरात वादळाने तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह नाल्याच्या पाण्यात उतरला.

लोकमत न्यूज नेटवर्क घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील (येठेवाडी) खंदरमाळ परिसरात वादळाने तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह नाल्याच्या पाण्यात उतरला. या नाल्यात आंघाेळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.

दर्शन अजित बर्डे (८), विराज अजित बर्डे (६), अनिकेत अरुण बर्डे (१२), ओंकार अरुण बर्डे (१०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही मुले आदिवासी कुटुंबातील असून, घरची परिस्थिती बिकट आहे. दर्शन, विराज, अनिकेत, ओंकार हे येठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. मुले शाळेत गेल्यानंतर आई-वडील मजुरीच्या कामावर निघून गेले होते. नंतर मुले वांदरकडा येथील छोट्याशा नाल्यात आंघोळीसाठी गेली असता याच नाल्याच्यावरुन गेलेली वीजवाहक तार तुटून पाण्यात पडलेली होती. हे मुलांच्या लक्षात आली नाही. पाण्यात उतरल्यानंतर वीजेचा शॉक लागून या चारही मुलांचा मृत्यू झाला. 

झोळीतून नेले मृतदेहnपावसामुळे रस्ता खराब झाल्याने रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे चारही मृतदेह झोळीच्या माध्यमातून तरुणांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. nनाल्यात वीजवाहक तार तुटून पडल्याबाबत महावितरणला कळविले होते. मात्र, महावितरणने तात्काळ दखल न घेतल्याने या चिमुकल्यांचा बळी गेला, अशी चर्चा होती. दरम्यान, येथील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, कोणीतरी हा वीजपुरवठा सुरु केला, असा खुलासा महावितरणने केला आहे.