शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सात दिवसांत साडेचार हजार नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी गुरुवारी उच्चांक गाठला होता. हा आलेख शुक्रवारी खाली आला असून, दिवसभरात ८२९ नवे ...

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी गुरुवारी उच्चांक गाठला होता. हा आलेख शुक्रवारी खाली आला असून, दिवसभरात ८२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या घटली असली, तरी दोन दिवसांत ती दुप्पट झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन वर्ष उलटले आहे. पण, वर्षपूर्तीनंतर त्याचे आव्हान आणखी वेगाने वाढले आहे. जिल्ह्यात दररोज ५०० ते ६०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. बुधवारपर्यंत हा आकडा स्थिर होता. परंतु, गुरुवारी अचानक १ हजार ३३८ नव्या रुग्णांची नोंद झाली. एकट्या नगर शहरात ४५७ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या दुपटीने वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांनंतर प्रथमच जिल्ह्यातील रुग्णसंख्येने एक हजारांचा टप्पा पार केला होता. हा आलेख वाढत जाऊन कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती होती. सुदैवाने शुक्रवारी हा आकडा कमी होऊन ८२९ झाला. चालू आठवड्यात आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढून जिल्हाभरातून १००० ते १२००० स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत आले. एका दिवसात एवढे सर्व नमुने तपासून होत नाहीत. त्यामुळे अचानक रुग्णसंख्या वाढली. नगर शहरातील रुग्णसंख्याही या कारणामुळेच वाढलेली दिसली. ती शुक्रवारी निम्म्याने कमी झाली. नगर शहरात शुक्रवारी दिवसभरात २३९ इतके रुग्णांची नोंद झाली. दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या घटली असली, तरी मागील दोन दिवसांत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. दररोजच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने मागील सात दिवसांत ४ हजार ७६७ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

........

मागील सात दिवसांतील रुग्णसंख्या

दिनांक रुग्णसंख्या

२० मार्च ८२९

२१मार्च ५५९

२२ ४७५

२३ ६११

२४ ४५६

२५ १३३८

२६ ८२९

....

कुठे किती आढळले रुग्ण

नगर शहर- २३९

काेपरगाव-८९

राहाता-८१

नगर-७४

श्रीरामपूर-५५

नेवासा-५२

पारनेर-४८

संगमनेर-३७

कर्जत-३२

रहुरी-३०

पाथर्डी-२९

अकोले-२७

श्रीगोंदा-१०

जामखेड-४

शेवगाव-२

...........