शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चाळीस वर्षांनंतर झाले भाजपचे पानिपत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 18:06 IST

जवखेडे खालसा ग्रामपंचायतीत फडकला राष्ट्रवादीचा झेंडा

मिरी : पाथर्डी तालुक्यातील अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या जवखेडे खालसा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून सत्ता ताब्यात मिळवण्यात विरोधी गटाला यश आले. सरपंच पदासाठी सत्ताधारी गटाकडून सुनंदा वाघ व विरोधी गटाकडून लक्ष्मीबाई वाघ या दोन जावांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत लक्ष्मीबाई वाघ तब्बल ९६१ मते मिळवून विजयी झाल्या.गेल्या चाळीस वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक व राजळे समर्थक उद्धव वाघ यांचेच एकहाती वर्चस्व असल्याने त्यांचेच पुतणे राष्ट्रवादीचे युवानेते अमोल वाघ यांनी स्वतंत्र पॅनल उभा करून उध्दव वाघ यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करून निवडणुकीत रंगत आणली.सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुनंदा वाघ, लक्ष्मीबाई वाघ या दोन जावा व नलिनी वाघ यांच्यात तिरंगी सामना रंगला. यामध्ये नलिनी वाघ यांना ४८७, सुनंदा वाघ यांना ८१६ व लक्ष्मीबाई वाघ यांना ९६१ मते मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.एकूण १२ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी अमोल वाघ गटाचे सरपंच पदासह एकूण नऊ उमेदवार निवडून येऊन सत्तापालट झाली. तत्पूर्वी मतदानाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी गटाचे अमोल वाघ यांनी तिसºया गटाचे नेतृत्व करणारे सुरेश वाघ यांच्याशी हातमिळवणी करून सत्ताधारी गटाला चितपट करण्याचा डाव आखल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकावयास मिळाली.अमोल वाघ राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते असून राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे तनपुरे यांनी विजयी सभेत प्रत्यक्ष हजेरी लावून वाघ यांना शुभेच्छा दिल्या.

विजयी उमेदवार

विरोधी गटाकडून लक्ष्मीबाई वाघ (सरपंच). सदस्य- उत्तम कासार, राणी कासार, द्वारकाबाई भोसले, नितीन जाधव, मीराबाई वाघ, शकिलाबी पठाण, अ‍ॅड. वैभव आंधळे, सुनीता सरगड, सत्ताधारी गट- अनिता आंधळे, भागवत घाटुळ, उध्दव मतकर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी