शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

/ माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST

अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री दिलीप मनसुखलाल गांधी (वय ७०) यांचे बुधवारी पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन ...

अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री दिलीप मनसुखलाल गांधी (वय ७०) यांचे बुधवारी पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या पार्थिवावर अहमदनगरमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी सरोज, देवेंद्र व सुवेंद्र ही विवाहित मुले, मुलगी श्वेता, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गांधी यांच्या अकाली निधनाने नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मतदारसंघातील खासदार म्हणून त्यांची नवी दिल्लीमध्ये वेगळी ओळख होती. १९९९, २००९ व २०१४ अशा तीन लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदनगर मतदारसंघातून ते विजयी झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते जहाज बांधणी राज्यमंत्री होते. सव्वा लाख सभासद असलेल्या नगर अर्बन सहकारी बँकेचे ते माजी अध्यक्ष होते.

९ मे १९५१ रोजी जन्मलेल्या गांधी यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. नगरमध्ये ज्यूस सेंटरची गाडी चालवून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ते जनसंघाचे स्वयंसेवक म्हणून राजकारणात आले. पुढे नगरसेवक ते मंत्री असा प्रवास केला. संपूर्ण आयुष्य ते भाजपशी एकनिष्ठ राहिले. भाजपच्या राम मंदिर आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनात त्यांना तुरुंगवासही झाला. खासदारकीच्या काळात नगर जिल्ह्यातील रेल्वे मार्ग, उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्गांच्या प्रश्नांसाठी त्यांनी पाठपुरावा केला. सन २०१९ मध्ये त्यांच्याऐवजी सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी दिली.

.......

दिल्लीत कोरोनाने घात केला

कोरोना लॉकडाऊनच्या काळात गांधी यांनी नियमांचे काटेकोर पालन करत घराबाहेर जाणे टाळले होते. मात्र, या महिन्याच्या प्रारंभी ते कामानिमित्त नगरहून दिल्लीत गेले व तेथे त्यांना कोरोनाची बाधा झाली.

............

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले. अहमदनगर मतदारसंघातून ते तीन वेळा लोकसभा सदस्य राहिले. ते एक लोकप्रिय जनसेवक होते. अहमदनगर आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. मी त्यांच्या नातेवाईक आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो.

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

..............

अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनात्मक बांधणीत गांधी यांचे मोेठे योगदान राहिले. एक उमदा लोकप्रतिनिधी म्हणून ते स्मरणात राहतील.

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

.............

माजी मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने दु:ख झाले. समाजसेवेसाठी आणि गोरगरिबांना मदत करणाऱ्या योगदानाबद्दल त्यांची आठवण येईल. महाराष्ट्रात भाजपला बळकट करण्यासाठी त्यांनी असंख्य प्रयत्न केले. त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

........

दिलीप गांधी यांनी नगरसेवक, खासदार आणि केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास केला. गत ९ मार्चला दिल्लीत मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली होती. त्यामुळे बुधवारी अचानक त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. सकल जैन समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी व त्यांची नेहमी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांबाबत चर्चा होत असे. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो.

- विजय दर्डा, माजी खासदार व सकल जैन समाज राष्ट्रीय अध्यक्ष

.......

माजी मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने एक लोकनेता आपण गमावला. अल्पसंख्याक जैन समाजातून पुढे आलेल्या गांधी यांनी सर्वांना सामावून घेणारे व्यापक राजकारण केले. काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षनिष्ठा व स्व कर्तृत्व या जोरावर ते तीन वेळा खासदार व केंद्रात मंत्री झाले. ते संघर्षमय व धडपड करणारे होते.

- राजेंद्र दर्डा, माजी मंत्री व एडिटर इन चीफ लोकमत.