शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कृषी केंद्रांकडून युरियासाठी इतर खते, औषधांची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 15:37 IST

पिकांना खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगा लावूनही युरिया खताची एक अथवा दोन गोण्या मिळत आहेत. मात्र, युरियासोबत इतर खते किंवा औषधे घेण्याची सक्ती केली जात आहे.

मधु ओझा । 

पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरात यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. शेतक-यांनी उत्साहात पेरणी केली. मात्र पिकांना खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगा लावूनही युरिया खताची एक अथवा दोन गोण्या मिळत आहेत. मात्र, युरियासोबत इतर खते किंवा औषधे घेण्याची सक्ती केली जात आहे.

युरियाचा तुटवडा भासणार नसल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात युरिया सहजासहजी मिळत नाही. कृषी सेवा केंद्रात फक्त १२० ते १५० युरियाच्या गोण्या येत आहेत. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने वाटप कसे करावे, याचा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. खतांबरोबर इतरही माल दुकानदारांना घ्यावा लागत आहे. युरिया खरेदी करणारा शेतकरी इतर माल घेण्याचे नाकारत आहे. त्यामुळे शेतकरी-कृषी सेवा केंद्र चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.

युरियाच्या पुरवठ्याकडे अहमदनगर जिल्हा पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे. पुणतांबा येथील कृषी सेवा केंद्राच्या शिल्लक मालाची तपासणी आणि चौकशी वरिष्ठ अधिका-यांकडून होणे गरजेचे आहे.         - नामदेवराव धनवटे, संचालक, पुण्यस्तंभ शेतकरी गट.

युरियाचा साठा कमी येत असल्याने मालाचा तुडवडा जाणवत आहे. पुरवठा कमी व मागणी वाढल्याने प्रत्येक आधारवर एक गोणी खताचे नियोजन केले आहे.

 -किरण धुमाळ, कृषी अधिकारी, पुणतांबा.

दरवर्षी राज्यातील युरियाची किती मागणी असते हे सरकारला माहिती असते. शेतक-यांची मागणी आगाऊ नोंदवून गावपातळीवर पुरवठा करावा. 

-विनोद धनवटे, सचिव, पाणलोट समिती पुणतांबा.     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताAgriculture Sectorशेती क्षेत्र