शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या प्रस्तावाचा खेळखंडोबा

By admin | Updated: February 3, 2015 17:27 IST

जुना प्रस्ताव गुंडाळून ठेवत डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याच्या नव्या प्रस्तावावर सोमवारी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

 अहमदनगर : जुना प्रस्ताव गुंडाळून ठेवत डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याच्या नव्या प्रस्तावावर सोमवारी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. एकाच पुलाचे तीन नवीन प्रस्ताव यानिमित्ताने समोर आले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे उड्डाण प्रस्तावांच्या 'खेळ'खंडोब्यात अधिकच लांबणारे, हे यानिमित्ताने समोर आले आहे. गेल्या सात वर्षांपासून शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम रेंगाळले आहे. भूसंपादनास विलंब झाल्याने पुलाचा खर्च ८८ कोटी २३ लाखांवर गेला आहे. विकासकाने पूर्वीच्या दराने काम करण्यास नकार देत न्यायालयात धाव घेतली. त्यावर लवाद नेमण्यात आला. प्रशासन व विकासकातील वाद सध्या लवादासमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दुपारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नव्या प्रस्तावाची माहिती दिली. उड्डाणपुलाचे काम विकासकाने केले नाही. त्याबदल्यात टोल वसुलीचा कालावधी कमी करून पुलाचा नवीन अद्ययावत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्वी हा पूल अक्षता गार्डन ते कोठीपर्यंतच र्मयादित होता. तो आता जिल्हा पोलीस अधीक्षक चौकापर्यंत आणला जाणार असून, त्यासाठीचे तीन वेगवेगळे प्रस्ताव तयार आहेत. अक्षता गार्डन ते डिएसपी चौकापर्यंतच्या चौपदरी पुलाचा सुमारे ७४0 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याशिवाय दुपदरीकरणाचे दोन प्रस्ताव आहेत. त्यामध्ये डिएसपी चौकापर्यंतच्या दुपदरी पुलाचा सुमारे ३७0 कोटी खर्चाचा प्रस्ताव आहे. तर अक्षता गार्डन ते जुने पाटील हॉस्पिटलपर्यंतच्या दुपदरी पुलाचा सुमारे २0५ कोटींचा आराखडा तयार केला गेला आहे. या तिन्हीही प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात येत्या गुरुवारी बैठक होत आहे. शहरातील वाहतुकीत भविष्यात वाढ होणार आहे. सुपा आणि घोडेगाव येथील औद्योगिक वसाहतीचाही विकास होईल. शहराची भविष्याची गरज लक्षात घेऊन उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यात आली आहे. त्यासाठी लागणार्‍या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी

>नगर शहरातून जाणारे महामार्ग चार पदरी आहेत. महामार्गावरील अतिक्रमणे काढून ते सहापदरी करावेत, जेणे करून वाहतूक सुरळीत होऊन अपघात होणार नाही, याबाबत खा. दिलीप गांधी यांनी आढावा बैठकीत सूचना केल्या. प्रशासनाच्या कारभारावर टीका करत, काम करा निधीचे आम्ही पाहतो, असे खा.गांधी यावेळी म्हणाले.