शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कर्जत तालुक्यातून आक्रोश मोर्चासाठी पाच हजार कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:10 IST

अहमदनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असा निर्धार कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

कर्जत : अहमदनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असा निर्धार कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मोर्चाचे नियोजन करण्यात आले. राज्य सरकार सध्या सर्वच ठिकाणी अपयशी ठरले आहे. यामुळे जनतेच्या मनात या सरकारविषयी मोठा रोष व्यक्त केला जात आहे म्हणून अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २८ मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक कर्जत येथे मंगळवारी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर सडकून टीका करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय लोळगे, कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य शाम कानगुडे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी शहाजीराजे भोसले, फिरोज पठाण, उमर खान, स्वप्नील तनपुरे, सचिन लाळगे, वैभव काळे, विशाल शेटे, निलेश गांगरडे. विकास राऊत, सचिन मांडगे उपस्थित होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत-जामखेडचे नेतृत्व करावे, अशी मागणी यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतNCPराष्ट्रवादी काँग्रेस