शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

आधी तुझं माझं जमेना, आता तुझ्यावाचून करमेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST

अहमदनगर : बेरोजगारी, व्यसनाधीनता, चारित्र्यावरील संशय, मोबाइल व सोशल मीडियाचा अतिवापर, प्रेमप्रकरणे, कुटुंबीयांपासून वेगळे राहण्याचा अट्टहास, माहेरून पैसे आणावेत, ...

अहमदनगर : बेरोजगारी, व्यसनाधीनता, चारित्र्यावरील संशय, मोबाइल व सोशल मीडियाचा अतिवापर, प्रेमप्रकरणे, कुटुंबीयांपासून वेगळे राहण्याचा अट्टहास, माहेरून पैसे आणावेत, अशा अनेक कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहेत. हे वाद भरोसा सेलकडे दाखल झाल्यानंतर समुपदेशनातून गेल्या साडेआठ महिन्यांत ५५० जोडप्यांचा पुन्हा संसार सुरळीत सुरू झाला आहे.

येथील भरोसा सेलमध्ये १ जानेवारी ते २४ सप्टेंबर २०२१ दरम्यान एकूण १६२० तक्रारी दाखल झाल्या. यातील ९० टक्के तक्रारदार या महिलांच्या आहेत. उर्वरित दहा टक्क्यांमध्ये पुरुष व काही ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील आहेत. भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांच्यासह सेलमधील हेड कॉस्टेबल उमेश इंगवले व इतर समुपदेशकांनी तक्रारदार महिला, तिचा पती व इतर नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटविले. पत्नीला नांदवयाचेच नाही अथवा आता मला सासरी जायचेच नाही, असा पवित्रा घेणाऱ्या जोडप्यांचे येथील समुपदेशकांनी मनपरविर्तन केले. त्यांना कायदेशीर बाबींची समज देत भविष्यात होणाऱ्या नुकसानीचीही जाणीव करून दिली. अशा प्रकारे ५५० जोडप्यांचा संसार पुन्हा एकदा आनंदाने फुलला.

--------------------------

नवरा सारखाच मोबाइल पाहतो

महिला किंवा पुरुषांकडून मोबाइलचा तसेच सोशल मीडियाचा अतिवापर हे बहुतांश तक्रारींतील एक कारण आहे. पती मला वेळ देत नाही. सारखा मोबाइलमध्ये बिझी असतो. तो त्याच्या मैत्रिणींशी चॅटिंग करतो. तर पत्नी सारखी मोबाइलमध्ये गुंतलेली असते. सोबतच बायको वारंवार माहेरी जाते, शॉपिंगला सारखे पैसे मागते. आदी शुल्लक कारणांमुळे वाद विकोपाला गेल्याचे दिसतात.

---------------------

वर्षभरात भरोसा सेलकडे दाखल प्रकरणे

एकूण तक्रारी - १६२०

वाद मिटलेले- ५५०

स्वतंत्र निर्णय-३१७

दप्तरी- १४७

कायदेशीर मदतीसाठी- २५

गुन्हा दाखल करण्याची शिफारस- २६७

---------------------------

भरोसा सेलमध्ये दाखल होणारे प्रत्येक प्रकरण गांभीर्याने हाताळले जाते. यात ९० टक्यांपेक्षा जास्त प्रकरणे ही पती-पत्नीमधील वादाची असतात. तक्रारीनंतर पती-पत्नीसह त्यांच्या नातेवाइकांना सेलमध्ये बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांचा संसार सुरळीत व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. एखाद्या महिलेचा सासरी छळ झाल्याच्या बाबी समोर आल्यानंतर त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाते, तसेच सदर महिलेस पुढील कायदेशीर मदत केली जाते.

- पल्लवी उंबरहंडे, प्रभारी अधिकारी, भरोसा सेल