शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आधी तुझं माझं जमेना, आता तुझ्यावाचून करमेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST

अहमदनगर : बेरोजगारी, व्यसनाधीनता, चारित्र्यावरील संशय, मोबाइल व सोशल मीडियाचा अतिवापर, प्रेमप्रकरणे, कुटुंबीयांपासून वेगळे राहण्याचा अट्टहास, माहेरून पैसे आणावेत, ...

अहमदनगर : बेरोजगारी, व्यसनाधीनता, चारित्र्यावरील संशय, मोबाइल व सोशल मीडियाचा अतिवापर, प्रेमप्रकरणे, कुटुंबीयांपासून वेगळे राहण्याचा अट्टहास, माहेरून पैसे आणावेत, अशा अनेक कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहेत. हे वाद भरोसा सेलकडे दाखल झाल्यानंतर समुपदेशनातून गेल्या साडेआठ महिन्यांत ५५० जोडप्यांचा पुन्हा संसार सुरळीत सुरू झाला आहे.

येथील भरोसा सेलमध्ये १ जानेवारी ते २४ सप्टेंबर २०२१ दरम्यान एकूण १६२० तक्रारी दाखल झाल्या. यातील ९० टक्के तक्रारदार या महिलांच्या आहेत. उर्वरित दहा टक्क्यांमध्ये पुरुष व काही ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील आहेत. भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांच्यासह सेलमधील हेड कॉस्टेबल उमेश इंगवले व इतर समुपदेशकांनी तक्रारदार महिला, तिचा पती व इतर नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटविले. पत्नीला नांदवयाचेच नाही अथवा आता मला सासरी जायचेच नाही, असा पवित्रा घेणाऱ्या जोडप्यांचे येथील समुपदेशकांनी मनपरविर्तन केले. त्यांना कायदेशीर बाबींची समज देत भविष्यात होणाऱ्या नुकसानीचीही जाणीव करून दिली. अशा प्रकारे ५५० जोडप्यांचा संसार पुन्हा एकदा आनंदाने फुलला.

--------------------------

नवरा सारखाच मोबाइल पाहतो

महिला किंवा पुरुषांकडून मोबाइलचा तसेच सोशल मीडियाचा अतिवापर हे बहुतांश तक्रारींतील एक कारण आहे. पती मला वेळ देत नाही. सारखा मोबाइलमध्ये बिझी असतो. तो त्याच्या मैत्रिणींशी चॅटिंग करतो. तर पत्नी सारखी मोबाइलमध्ये गुंतलेली असते. सोबतच बायको वारंवार माहेरी जाते, शॉपिंगला सारखे पैसे मागते. आदी शुल्लक कारणांमुळे वाद विकोपाला गेल्याचे दिसतात.

---------------------

वर्षभरात भरोसा सेलकडे दाखल प्रकरणे

एकूण तक्रारी - १६२०

वाद मिटलेले- ५५०

स्वतंत्र निर्णय-३१७

दप्तरी- १४७

कायदेशीर मदतीसाठी- २५

गुन्हा दाखल करण्याची शिफारस- २६७

---------------------------

भरोसा सेलमध्ये दाखल होणारे प्रत्येक प्रकरण गांभीर्याने हाताळले जाते. यात ९० टक्यांपेक्षा जास्त प्रकरणे ही पती-पत्नीमधील वादाची असतात. तक्रारीनंतर पती-पत्नीसह त्यांच्या नातेवाइकांना सेलमध्ये बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांचा संसार सुरळीत व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. एखाद्या महिलेचा सासरी छळ झाल्याच्या बाबी समोर आल्यानंतर त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाते, तसेच सदर महिलेस पुढील कायदेशीर मदत केली जाते.

- पल्लवी उंबरहंडे, प्रभारी अधिकारी, भरोसा सेल