शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खरीप आवर्तनानंतर ५० वर्षांनंतर प्रथमच भरले मुळा धरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 18:00 IST

ऐन पावसाळ्यात खरीप पिकांसाठी पाण्याचे आवर्तन व नदीपात्रातून जायकवाडीलाही यंदा पाणी गेले़  तरी देखील यंदा पुन्हा मुळा धरण भरण्याची ऐतिहासिक घटना गेल्या ५० वर्षांत प्रथम घडत आहे़ त्यामुळे यंदा बळीराजाला चार आवर्तन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे़

भाऊसाहेब येवले राहुरी : ऐन पावसाळ्यात खरीप पिकांसाठी पाण्याचे आवर्तन व नदीपात्रातून जायकवाडीलाही यंदा पाणी गेले़  तरी देखील यंदा पुन्हा मुळा धरण भरण्याची ऐतिहासिक घटना गेल्या ५० वर्षांत प्रथम घडत आहे़ त्यामुळे यंदा बळीराजाला चार आवर्तन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे़ मात्र पाण्याची दरवर्षी होणारी नासाडी हे शेतकरी व पाटबंधारे खात्यापुढे मोठे आव्हान असणार आहे़यंदा पाणलोट क्षेत्रावर २२५ मिमी पावसाची नोंद झाली़ याउलट लाभक्षेत्रावर ५० टक्के पाऊस पडला़ त्यामुळे ऐन पावसाळ्यात मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे लागले़ मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून २ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले़ वांबोरी व भागडा चारीतून ७० दशलक्ष घनफूटपाणी सोडण्यात आले़ सध्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १ हजार १७८ क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १४० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ याशिवाय नदी पात्रात १ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते़ मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली ७३ हजार हेक्टर तर डाव्या कालव्याखाली १० हजार हेक्टर क्षेत्र आहे़ मुळा धरणातून चार आवर्तन झाले तर शेती व्यवसायाला उर्जितवस्था निर्माण होते़ सध्या मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यात जमा आहे़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २४ हजार ५६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे़ धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे़ सर्वसाधारण दीड महिना पाण्याची आवक सुरू राहणार आहे़ त्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने पुन्हा भरणार असून त्यानंतर पुन्हा जायकवाडी धरणाकडे पाणी झेपावणार आहे़ धरणाकडे पाण्याची चार हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़मुळा धरण प्रकल्प शेतीसाठी उभारण्यात आला़ मात्र काळाच्या ओघात पिण्यासाठी व उद्योगधंद्यासाठी धरणातील पाण्याला प्राधान्य देण्यात आले़ समन्यायी पाणी वाटपाने जायकवाडी मुळा धरणाच्या पाण्यात वाटेकरी आहे़ यंदा मुळा धरण भरून पाणी वाहिल्याने शेतीसाठी पुरेशा प्रमाणावर चार आवर्तने उपलब्ध होणार आहे़ गेल्यावर्षी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़  याशिवाय नदीपात्रात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे शेतीला केवळ एका पाण्यावर तहान भागावी लागली होती़ त्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट झाली होती़ १५ आॅक्टोबर रोजी पाणी वाटप नियोजन होणार आहे़

टॅग्स :mula muthaमुळा मुठाAhmednagarअहमदनगर