शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

पहिली पसंती निर्णायक ठरणार

By admin | Updated: December 24, 2015 23:37 IST

अहमदनगर: विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार असले तरी सेनेचे शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्यातच खरी लढत रंगली आहे़

अहमदनगर: विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार असले तरी सेनेचे शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्यातच खरी लढत रंगली आहे़ त्यामुळे पहिल्या पसंतीची मते निर्णायक ठरण्याची शक्यता बळावली आहे़ पहिल्या फेरीत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे़काँग्रेसचे अपक्ष उमेदवार जयंत ससाणे यांनी माघार घेतली आहे़ परंतु ससाणे यांचे मतपत्रिकेत नाव कायम आहे़ याशिवाय मच्छिंद्र सुपेकर अपक्ष उमेदवार आहेत़ चारपैकी ए आणि बी, उमेदवार सक्रिय आहेत़ ए आणि बी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असून, दोघांमध्येच खरी लढत सुरू असल्याचे चित्र सध्या तरी आहे़ मतदारांना पहिली पसंती देणे बंधनकारक आहे़ उर्वरित दोन, तीन, आणि चार, या क्रमांची मते ऐच्छिक आहेत़ त्यामुळे ए उमेदवाराला पहिली पसंती देणारा मतदार विरोधक बी ला दुसरी पसंती देणार नाही़ बी उमेदवाराला पहिली पसंती देणारा मतदार ए ला दुसरी पसंती देणार नाही़ कारण पहिल्या फेरीत २१६ चा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातील़ दुसऱ्या फेरीत डी आणि सी ला मते मिळाली नाहीत, असे गृहीत धरल्यास दुसरी फेरीची मते मोजण्याची आवश्यकता राहणार नाही. दुसऱ्या क्रमांकावर दगा फटका होऊ शकतो़ त्यामुळे हा धोका कुणीही स्वीकारणार नाही़ उमेदवारांकडूनही तसाच प्रचार सुरू आहे़ पहिल्या पसंतीवरच ए आणि बी उमेदवाराने लक्ष केंद्रीत केले असल्याने दुसऱ्या फेरीची गरज पडणार नाही, असे म्हणण्यास वाव आहे़ पहिल्या पसंतीच्याच मतांची मागणी दोन्ही उमेदवार करत आहेत़ दुसऱ्या क्रमांकाचा धोका नकोच, अशी सावध भूमिका प्रचारात घेतली जात आहे़ निवडणुकीतून सी उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांना मतदान होणार नाही़ पण, निष्ठावंतांकडून सी उमेदवाराला मतदान होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या मतांची मोजणी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही, असाही एक सूर आहे़ (प्रतिनिधी)उतरत्या क्रमाने उमेदवारांची यादीपहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळणारा उमेदवार प्रथम क्रमांकावर असेल़ त्यापेक्षा कमी मते मिळणारा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे़ मिळालेल्या मतानुसार उतरत्या क्रमांकाने ए, बी,सी, आणि डी उमेदवारांची क्रमवारी लावली जाईल़ ए आणि बी उमेदवारालाच मते पडली आणि इतरांना मते मिळाली नाही तर अशावेळी पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मते असणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्यात येईल़