शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

पहिली पसंती निर्णायक ठरणार

By admin | Updated: December 24, 2015 23:37 IST

अहमदनगर: विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार असले तरी सेनेचे शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्यातच खरी लढत रंगली आहे़

अहमदनगर: विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार असले तरी सेनेचे शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्यातच खरी लढत रंगली आहे़ त्यामुळे पहिल्या पसंतीची मते निर्णायक ठरण्याची शक्यता बळावली आहे़ पहिल्या फेरीत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे़काँग्रेसचे अपक्ष उमेदवार जयंत ससाणे यांनी माघार घेतली आहे़ परंतु ससाणे यांचे मतपत्रिकेत नाव कायम आहे़ याशिवाय मच्छिंद्र सुपेकर अपक्ष उमेदवार आहेत़ चारपैकी ए आणि बी, उमेदवार सक्रिय आहेत़ ए आणि बी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असून, दोघांमध्येच खरी लढत सुरू असल्याचे चित्र सध्या तरी आहे़ मतदारांना पहिली पसंती देणे बंधनकारक आहे़ उर्वरित दोन, तीन, आणि चार, या क्रमांची मते ऐच्छिक आहेत़ त्यामुळे ए उमेदवाराला पहिली पसंती देणारा मतदार विरोधक बी ला दुसरी पसंती देणार नाही़ बी उमेदवाराला पहिली पसंती देणारा मतदार ए ला दुसरी पसंती देणार नाही़ कारण पहिल्या फेरीत २१६ चा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातील़ दुसऱ्या फेरीत डी आणि सी ला मते मिळाली नाहीत, असे गृहीत धरल्यास दुसरी फेरीची मते मोजण्याची आवश्यकता राहणार नाही. दुसऱ्या क्रमांकावर दगा फटका होऊ शकतो़ त्यामुळे हा धोका कुणीही स्वीकारणार नाही़ उमेदवारांकडूनही तसाच प्रचार सुरू आहे़ पहिल्या पसंतीवरच ए आणि बी उमेदवाराने लक्ष केंद्रीत केले असल्याने दुसऱ्या फेरीची गरज पडणार नाही, असे म्हणण्यास वाव आहे़ पहिल्या पसंतीच्याच मतांची मागणी दोन्ही उमेदवार करत आहेत़ दुसऱ्या क्रमांकाचा धोका नकोच, अशी सावध भूमिका प्रचारात घेतली जात आहे़ निवडणुकीतून सी उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांना मतदान होणार नाही़ पण, निष्ठावंतांकडून सी उमेदवाराला मतदान होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या मतांची मोजणी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही, असाही एक सूर आहे़ (प्रतिनिधी)उतरत्या क्रमाने उमेदवारांची यादीपहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळणारा उमेदवार प्रथम क्रमांकावर असेल़ त्यापेक्षा कमी मते मिळणारा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे़ मिळालेल्या मतानुसार उतरत्या क्रमांकाने ए, बी,सी, आणि डी उमेदवारांची क्रमवारी लावली जाईल़ ए आणि बी उमेदवारालाच मते पडली आणि इतरांना मते मिळाली नाही तर अशावेळी पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मते असणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्यात येईल़