शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

आधी निरीक्षण मग अ‍ॅक्शन : ईशू सिंधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:18 IST

गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़ याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे़ आधी पूर्णत: निरीक्षण केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़सिंधू म्हणाले नगरचा पदभार स्वीकारून अवघे काही दिवस झाले आहेत़ कामाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याआधी हा जिल्हा आणि येथील प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे़ बदली होऊन गेलेले पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी येथील गुन्हेगारीविरोधात राबविलेल्या मोहिमा प्रभावी ठरल्या आहेत़अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात काम करण्याचा मानस आहे़ याच अनुशंगाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योग्य त्या सूचना देण्याचे काम सुरू केले असल्याचे सिंधू म्हणाले़पोलीस अधीक्षकांसमोरील आव्हानेअवैध दारू विक्रीअवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायातून दोन वर्षांपूर्वी नगर तालुक्यातील पांगरमल येथे दहा जणांना जीव गमवावा लागला होता़ सध्या खेडोपाडी गावठी दारू तयार करून विकली जात आहे़ याकडे उत्पादन शुल्क आणि स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष आहे़ लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम पोलिसांनी आणखी कडक करावी लागणार आहे़वाळूतस्करांची दहशतवाळूतस्करीतून जिल्ह्यात गुंडगिरी फोपावली आहे़ सध्या जिल्ह्यातील एकाही वाळू ठेक्याचा लिलाव झालेला नाही़ वाळूतस्कर मात्र अवैधरीत्या वाळूचा उपसा करून विक्री करत आहेत़ यातून महसूल पथकावर तर कधी ग्रामस्थांवर गुंडांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे़ वाळू वाहतूक करणाºया वाहनांखाली अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे़ महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविली तरच जिल्ह्यातील वाळूतस्करीला आळा बसणार आहे़गावठी कट्यांची तस्करीनगर जिल्ह्यात बिहार आणि मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात गावठी कट्यांची तस्करी होते़ अवघ्या दहा ते पंधरा हजार रुपयांना हे गावठी कट्टे विकले जात आहेत़ केडगाव आणि जामखेड येथील हत्याकांड गावठी कट्याच्या सहाय्यानेच झाले होते़ मध्यंतरी पोलिसांनी हत्यार तस्करीविरोधात व्यापक मोहीम राबविली होती़ ही हत्यार तस्करी मात्र थांबलेली दिसत नाही़हद्दपारीचे अस्त्र वापरावेच लागेललोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ निवडणूक काळात राजकीय गुंडगिरीला उधाण येते़ गावापासून ते शहरापर्यंत राजकीय कारणातून वाद होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ निवडणूक काळात शांतता रहावी, यासाठी रंजनकुमार शर्मा यांनी वापरलेले हद्दपारीचे अस्त्र सिंधू यांनाही वापरावेच लागणार आहे़परप्रांतीय टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखीगेल्या तीन ते चार वर्षांपासून परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत़ गेल्या दोन वर्षांत अनेक परप्रांतीय टोळ्यांनी जिल्ह्यात चोरी, फसवणूक व दरोडे टाकले आहेत़ यातील काही टोळ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ या टोळ्यांचा उपद्र मात्र कमी झालेला नाही़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस