शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

आधी निरीक्षण मग अ‍ॅक्शन : ईशू सिंधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:18 IST

गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़ याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे़ आधी पूर्णत: निरीक्षण केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़सिंधू म्हणाले नगरचा पदभार स्वीकारून अवघे काही दिवस झाले आहेत़ कामाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याआधी हा जिल्हा आणि येथील प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे़ बदली होऊन गेलेले पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी येथील गुन्हेगारीविरोधात राबविलेल्या मोहिमा प्रभावी ठरल्या आहेत़अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात काम करण्याचा मानस आहे़ याच अनुशंगाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योग्य त्या सूचना देण्याचे काम सुरू केले असल्याचे सिंधू म्हणाले़पोलीस अधीक्षकांसमोरील आव्हानेअवैध दारू विक्रीअवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायातून दोन वर्षांपूर्वी नगर तालुक्यातील पांगरमल येथे दहा जणांना जीव गमवावा लागला होता़ सध्या खेडोपाडी गावठी दारू तयार करून विकली जात आहे़ याकडे उत्पादन शुल्क आणि स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष आहे़ लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम पोलिसांनी आणखी कडक करावी लागणार आहे़वाळूतस्करांची दहशतवाळूतस्करीतून जिल्ह्यात गुंडगिरी फोपावली आहे़ सध्या जिल्ह्यातील एकाही वाळू ठेक्याचा लिलाव झालेला नाही़ वाळूतस्कर मात्र अवैधरीत्या वाळूचा उपसा करून विक्री करत आहेत़ यातून महसूल पथकावर तर कधी ग्रामस्थांवर गुंडांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे़ वाळू वाहतूक करणाºया वाहनांखाली अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे़ महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविली तरच जिल्ह्यातील वाळूतस्करीला आळा बसणार आहे़गावठी कट्यांची तस्करीनगर जिल्ह्यात बिहार आणि मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात गावठी कट्यांची तस्करी होते़ अवघ्या दहा ते पंधरा हजार रुपयांना हे गावठी कट्टे विकले जात आहेत़ केडगाव आणि जामखेड येथील हत्याकांड गावठी कट्याच्या सहाय्यानेच झाले होते़ मध्यंतरी पोलिसांनी हत्यार तस्करीविरोधात व्यापक मोहीम राबविली होती़ ही हत्यार तस्करी मात्र थांबलेली दिसत नाही़हद्दपारीचे अस्त्र वापरावेच लागेललोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ निवडणूक काळात राजकीय गुंडगिरीला उधाण येते़ गावापासून ते शहरापर्यंत राजकीय कारणातून वाद होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ निवडणूक काळात शांतता रहावी, यासाठी रंजनकुमार शर्मा यांनी वापरलेले हद्दपारीचे अस्त्र सिंधू यांनाही वापरावेच लागणार आहे़परप्रांतीय टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखीगेल्या तीन ते चार वर्षांपासून परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत़ गेल्या दोन वर्षांत अनेक परप्रांतीय टोळ्यांनी जिल्ह्यात चोरी, फसवणूक व दरोडे टाकले आहेत़ यातील काही टोळ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ या टोळ्यांचा उपद्र मात्र कमी झालेला नाही़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस