शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

अखेर आढळाधरणातून रब्बी आवर्तन सुटले : सुरक्षेच्या कारणास्तव कमी दाबाने प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:09 IST

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.

गणोरे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.मात्र, धरणाच्या लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यांतून यंदाचा पाण्याचा पहिलाच प्रवाह कालव्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी दाबाने सोडण्यात आला आहे. कालव्यांतील अडथळ्यांची भीती असल्याने, रात्रीच्या वेळी पाण्याचा प्रवास सिंचन यंत्रणेसाठी चिंताजनक असल्याचे समजते. नेहमी पहाटेच्या वेळी पाणी सोडून दिवसभरात पाण्याच्या प्रवाहातील तुंबलेल्या अडथळ्यांना दूर करता येते. मात्र, यंदा अद्याप कालव्यांतील स्वच्छता पुरेशी झालेली नाही. आवर्तन सोडण्याबाबत आजही द्विधा मनस्थितीत असलेल्या अधिका-यांनी अखेर दुपारी दोन्ही कालव्यांत प्रत्येकी २० क्युसेकने पाणी सोडले आहे. सोमवार १५ जानेवारीस पहाटे हे आवर्तन जाहीर केल्याप्रमाणे पुरेशा तयारीअभावी सोडताच आले नाही. त्यामुळे उशिराने मंगळवारी दुपारी सोडण्यात आले आहे.

पहिल्यांदाच रब्बीचे आवर्तन एवढे रखडले

रब्बी हंगाम सुरू होऊनही तीन महिने उलटले. नुकतेच कालव्यांमधील गवत व झाडा - झुडपांच्या सफाईचे काम घाईघाईत करण्यात आले आहे. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या उशिरापर्यंत रब्बी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन रखडण्याची वेळ आली आहे. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात ९७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील उपयुक्त पाणी साठ्यातून रब्बी हंगामातील अन्नधान्य, चारापिके,उभ्या भुसार पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले