शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

अखेर आढळाधरणातून रब्बी आवर्तन सुटले : सुरक्षेच्या कारणास्तव कमी दाबाने प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:09 IST

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.

गणोरे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.मात्र, धरणाच्या लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यांतून यंदाचा पाण्याचा पहिलाच प्रवाह कालव्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी दाबाने सोडण्यात आला आहे. कालव्यांतील अडथळ्यांची भीती असल्याने, रात्रीच्या वेळी पाण्याचा प्रवास सिंचन यंत्रणेसाठी चिंताजनक असल्याचे समजते. नेहमी पहाटेच्या वेळी पाणी सोडून दिवसभरात पाण्याच्या प्रवाहातील तुंबलेल्या अडथळ्यांना दूर करता येते. मात्र, यंदा अद्याप कालव्यांतील स्वच्छता पुरेशी झालेली नाही. आवर्तन सोडण्याबाबत आजही द्विधा मनस्थितीत असलेल्या अधिका-यांनी अखेर दुपारी दोन्ही कालव्यांत प्रत्येकी २० क्युसेकने पाणी सोडले आहे. सोमवार १५ जानेवारीस पहाटे हे आवर्तन जाहीर केल्याप्रमाणे पुरेशा तयारीअभावी सोडताच आले नाही. त्यामुळे उशिराने मंगळवारी दुपारी सोडण्यात आले आहे.

पहिल्यांदाच रब्बीचे आवर्तन एवढे रखडले

रब्बी हंगाम सुरू होऊनही तीन महिने उलटले. नुकतेच कालव्यांमधील गवत व झाडा - झुडपांच्या सफाईचे काम घाईघाईत करण्यात आले आहे. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या उशिरापर्यंत रब्बी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन रखडण्याची वेळ आली आहे. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात ९७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील उपयुक्त पाणी साठ्यातून रब्बी हंगामातील अन्नधान्य, चारापिके,उभ्या भुसार पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले