शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

...अखेर अळकुटी परिसराला पूर्ण दाबाने मिळाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:18 IST

अळकुटी : अखेर पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावांना पिंपळगाव जोगेचे आवर्तन पूर्ण दाबाने मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खासदार ...

अळकुटी : अखेर पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावांना पिंपळगाव जोगेचे आवर्तन पूर्ण दाबाने मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी समन्वय ठेवून कार्यकर्ते, अधिकारी यांच्याशी बोलून पूर्ण दाबाने पाणी मिळवून दिले, असा दावा पिंपगळगाव जोगे कालवा कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. भास्कर शिरोळे यांनी केला आहे.

पिंपळगाव जोगेच्या मागील आवर्तनाचे पाणी अळकुटी परिसरातील पाडळी आळे, पाबळ, लोणी मावळा आदी गावांना पूर्ण दाबाने मिळाले नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पाणीच मिळाले नव्हते. त्यामुळे येथील पाणीप्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर यामध्ये डॉ. सुजय विखे यांन लक्ष घातले. त्यांनी अळकुटी येथे ५ एप्रिल रोजी पाणी परिषद घेऊन अधिकारी आणि शेतकरी यांच्याबरोबरच चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी पिंपळगाव जोगेचे आवर्तन सोडल्यानंतर पाणी शेवटच्या लाभार्थ्याला मिळावे, यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लावली होती, असे डॉ. शिरोळे यांनी सांगितले. पाणी कालव्यातून सुरू झाल्यानंतर ते किती क्षमेतेने वाहत आहे, याकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी काही कार्यकर्त्यांनी नेमणूक केली होती. ते कार्यकर्ते प्रत्येक तासाला कालव्यातील पाणी किती दाबाने सुरू आहे, याची माहिती विखे यांना देत होते. त्यानंतर काही अडचण असल्यास विखे स्वत: अधिकाऱ्यांशी बोलत होते. त्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळाले, असे डॉ. शिरोळे यांनी सांगितले. यामुळे सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाले.

---

अळकुटी परिसरातील शेतकऱ्यांना पिंपळगाव जोगेचे आवर्तन उच्च दाबाने मिळाल्यामुळे सर्वांना पाणी मिळाले. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. यापुढेही खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली असेच नियोजन केले जाईल.

- डॉ. भास्कर शिरोळे

अध्यक्ष, पिंपगळगाव जोगे कालवा कृती समिती

---२५ पिंपळगाव जोगे

अळकुटी परिसरात पूर्ण क्षमतेने वाहणारा पिंपळगाव जोगे कालवा.