शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारी महिन्यात भिंगारला मिळाले अवघे चार दिवस पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST

भिंगार : फेब्रुवारी महिन्यात छावणी परिषद प्रशासनाने भिंगारला अवघे चारच दिवस पाणी सोडले आहे. येथील पाणीप्रश्न असा बिकट झाल्याने ...

भिंगार : फेब्रुवारी महिन्यात छावणी परिषद प्रशासनाने भिंगारला अवघे चारच दिवस पाणी सोडले आहे. येथील पाणीप्रश्न असा बिकट झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सतत पाणी प्रश्न उद‌्भवत असल्याने नागरिकांमध्ये छावणी परिषद प्रशासनाविषयी प्रचंड रोष आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भिंगारमध्ये पाणीपुरवठा अनियमित आहे. वेळेवर पाणी सुटत नाही. पाच वर्षांपूर्वी दिवसातून दोनवेळा पाणी सुटत होते. परंतु, आता आठवड्यातून दोन ते तीन वेळाच पाणी सोडले जाते. तेही फेब्रुवारी महिन्यात अवघ्या चारच दिवस सुटले. यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव पाणी विकत घ्यावे लागते. काही नागरिकांनी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. राजकीय पक्षाने किंवा संघटनांनी आंदोलन केल्यानंतर दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो. त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होते. पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होतो व नागरिकांना आठवड्यात दोन ते तीन वेळाच पाणी मिळते. तेही पुरेसे नसते. त्यामुळे नागरिकांमध्ये छावणी परिषद प्रशासनाविषयी प्रचंड नाराजी आहे.

---

आंदोलनाशिवाय पाणी सुटेल का?

गेल्या काही वर्षांपासून भिंगारमध्ये पाण्याची समस्या सुरू आहे. प्रत्येक वेळी काही तरी कारणावरून येथे महिना-महिनाभर पाणी सुटत नाही. याचे कारण काय? असा प्रश्न नागरिकांना पडतो. त्यानंतर काही राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आंदोलन करतात. तात्पुरते पाणी सुटते. त्यामुळे आंदोलनाशिवाय भिंगारला कधी पाणी सुटेल का? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

पाणीप्रश्नाबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लाेकमत’ प्रतिनिधीने मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

----

छावणी परिषदने फेब्रुवारी महिन्यात केवळ ४, ९, १८, २६ असे चारच दिवस पाणी सोडले. नेमका गोंधळ कुठे होतो. छावणी परिषदेचे कर्मचारीच काही तरी गोंधळ करत असावेत. लष्करी हद्दीत वेळेवर पाणी येते. मग छावणी परिषद नागरिकांनाच वेळेवर पाणी का मिळत नाही. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यायला हवे.

-मतीन सय्यद,

अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक, भिंगार