शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

भय इथले संपत नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:53 IST

अठराविश्व दारिद्र्य उराशी बाळगून अशिक्षित पिढी सांभाळताना नाकेनऊ आलेली कुटुंबे प्रगत अशा श्रीगोंदा तालुक्यात ढोकराईच्या माळावर आली आहेत.

विजय उंडेमढेवडगाव : अठराविश्व दारिद्र्य उराशी बाळगून अशिक्षित पिढी सांभाळताना नाकेनऊ आलेली कुटुंबे प्रगत अशा श्रीगोंदा तालुक्यात ढोकराईच्या माळावर आली आहेत. समाजापासून कोसो दूर असलेल्या या कुटुंबांची अवहेलना पाहून मन सुन्न होऊन जाते. भिक्षुकीवरच उदरनिर्वाह करणारी कुटुंबे राईनपाड्याच्या घटनेनंतर अजूनही भेदरलेली आहेत.नगर-दौड महामार्गालगत नागवडे साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या जोशी, गोपाळ, वैदू, नंदीवाले, नाथपंथी डवरी गोसावी, तेलवाला समाज, गवळी, पारधी अशा महाराष्ट्रात दुर्मिळ असणाºया अनेक वेगवेगळ्या पंथांच्या भटक्या जमाती येथे गुण्यागोविंदाने राहताहेत. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर या परिसराला भेट दिली असता अनेक विदारक बाबी समोर आल्या.दारिद्र्य किती विदारक असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा तांडा. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही या तांड्यापर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत. शिक्षणाचा पूर्णपणे अभाव असल्याने व लहान लहान मुले उघडी-नागडी फिरताना या तांड्यावर चोहीकडे दिसतात. यांचे उदरनिवार्हाचे मुख्य साधन व व्यवसाय भिक्षुकी मागणे.राईनपाड्यामुळे यातील सर्वच कुटुंबे भेदरलेली आहेत. पुरुषमंडळी घर सोडायला तयार होत नाहीत. या समाजातील पुरुषांना व स्त्रियांना दुसरा व्यवसाय येत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यांना शिधापत्रिका नाही. नावाची ओळख नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही सोयीसुविधा यांच्यापर्यंत पोहचतच नाहीत. (पूर्वार्ध)मुलांचे भविष्य काय?महिलांच्या व पुरुषांच्या अंगावर मागून आणलेले जुने-पुराने कपडे आहेत. नवीन कपडे हे सणासुदीलाही घालत नाहीत. त्यांच्या मुलांची नावे विचारली असता एका पाच वर्षांच्या मुलाने रणबीर व दुसºयाने सलमान अशी नावे सांगितली. रणबीर व सलमानच्या अंगावर बोटभर कपडा नव्हता. प्रश्न पडतो या रणबीर व सलमानचे भविष्य काय?

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा