शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भय इथले संपत नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:53 IST

अठराविश्व दारिद्र्य उराशी बाळगून अशिक्षित पिढी सांभाळताना नाकेनऊ आलेली कुटुंबे प्रगत अशा श्रीगोंदा तालुक्यात ढोकराईच्या माळावर आली आहेत.

विजय उंडेमढेवडगाव : अठराविश्व दारिद्र्य उराशी बाळगून अशिक्षित पिढी सांभाळताना नाकेनऊ आलेली कुटुंबे प्रगत अशा श्रीगोंदा तालुक्यात ढोकराईच्या माळावर आली आहेत. समाजापासून कोसो दूर असलेल्या या कुटुंबांची अवहेलना पाहून मन सुन्न होऊन जाते. भिक्षुकीवरच उदरनिर्वाह करणारी कुटुंबे राईनपाड्याच्या घटनेनंतर अजूनही भेदरलेली आहेत.नगर-दौड महामार्गालगत नागवडे साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या जोशी, गोपाळ, वैदू, नंदीवाले, नाथपंथी डवरी गोसावी, तेलवाला समाज, गवळी, पारधी अशा महाराष्ट्रात दुर्मिळ असणाºया अनेक वेगवेगळ्या पंथांच्या भटक्या जमाती येथे गुण्यागोविंदाने राहताहेत. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर या परिसराला भेट दिली असता अनेक विदारक बाबी समोर आल्या.दारिद्र्य किती विदारक असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा तांडा. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही या तांड्यापर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत. शिक्षणाचा पूर्णपणे अभाव असल्याने व लहान लहान मुले उघडी-नागडी फिरताना या तांड्यावर चोहीकडे दिसतात. यांचे उदरनिवार्हाचे मुख्य साधन व व्यवसाय भिक्षुकी मागणे.राईनपाड्यामुळे यातील सर्वच कुटुंबे भेदरलेली आहेत. पुरुषमंडळी घर सोडायला तयार होत नाहीत. या समाजातील पुरुषांना व स्त्रियांना दुसरा व्यवसाय येत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यांना शिधापत्रिका नाही. नावाची ओळख नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही सोयीसुविधा यांच्यापर्यंत पोहचतच नाहीत. (पूर्वार्ध)मुलांचे भविष्य काय?महिलांच्या व पुरुषांच्या अंगावर मागून आणलेले जुने-पुराने कपडे आहेत. नवीन कपडे हे सणासुदीलाही घालत नाहीत. त्यांच्या मुलांची नावे विचारली असता एका पाच वर्षांच्या मुलाने रणबीर व दुसºयाने सलमान अशी नावे सांगितली. रणबीर व सलमानच्या अंगावर बोटभर कपडा नव्हता. प्रश्न पडतो या रणबीर व सलमानचे भविष्य काय?

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा