शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला : लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 19:05 IST

कडाक्याचे ऊन असले तरी आधीच कडक निर्बंधामुळे नागरिक घरीच असल्याने उन्हापासून दूरच आहेत. कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळाला असेच जिल्ह्यात चित्र आहे.

ठळक मुद्देउष्माघाताचे बळी२०१९ -०२२०२० -००२०२१ -००

अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये विविध आजारांचे रुग्ण एकतर घरीच बसलेले आहेत किंवा रुग्णालयात दाखल आहेत. कडाक्याचे ऊन असले तरी आधीच कडक निर्बंधामुळे नागरिक घरीच असल्याने उन्हापासून दूरच आहेत. कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळाला असेच जिल्ह्यात चित्र आहे.

विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या आधीच कमी झाली आहे. मात्र काही जणांना ऊन लागले, उन्हाचा त्रास झाला तरीही रुग्णांनी दवाखान्यात न जाता घरीच उपचार घेतले आहेत. शिवाय जिल्हा रुग्णालयात सर्वच रुग्ण कोरोनाचे असल्याने दरवर्षी असणारा उष्माघात कक्ष यंदा मात्र दिसून आला नाही.

जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान तापमान साधारणपणे ३८ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. यंदाही तापमानाने चाळिशी ओलांडली, मात्र त्याची तीव्रता जाणवली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावे, याबाबत दरवर्षी सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून आले नाही. मागील वर्षी तापमानही ४२.५ अंश सेल्सिअसच्या वर गेलेले होते.

अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यातही तापमानाचा पारा 40 च्या वर होता.

ऊन वाढले तरी....

जिल्ह्यात एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. साधारणत: ४० अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान गेले होते. मात्र त्यावेळेसही उष्माघात कक्ष उभारण्याविषयी नियोजन झाले नाही. यंदा एप्रिल हीटही तसा जाणवला, मात्र कोरोनापुढे सर्व आजार आता थंड पडले आहेत.

उन्हाळा घरातच.....

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याने इतर काही छोटे आजार घरगुती उपचाराने बरे करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेकजण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायाला लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.

दरवर्षी प्रत्येक आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष असतो. तिथे रुग्ण आल्यास तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी उष्माघाताचा एकही रुग्ण आला नाही.

-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHeat Strokeउष्माघात