शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला : लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 19:05 IST

कडाक्याचे ऊन असले तरी आधीच कडक निर्बंधामुळे नागरिक घरीच असल्याने उन्हापासून दूरच आहेत. कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळाला असेच जिल्ह्यात चित्र आहे.

ठळक मुद्देउष्माघाताचे बळी२०१९ -०२२०२० -००२०२१ -००

अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये विविध आजारांचे रुग्ण एकतर घरीच बसलेले आहेत किंवा रुग्णालयात दाखल आहेत. कडाक्याचे ऊन असले तरी आधीच कडक निर्बंधामुळे नागरिक घरीच असल्याने उन्हापासून दूरच आहेत. कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळाला असेच जिल्ह्यात चित्र आहे.

विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या आधीच कमी झाली आहे. मात्र काही जणांना ऊन लागले, उन्हाचा त्रास झाला तरीही रुग्णांनी दवाखान्यात न जाता घरीच उपचार घेतले आहेत. शिवाय जिल्हा रुग्णालयात सर्वच रुग्ण कोरोनाचे असल्याने दरवर्षी असणारा उष्माघात कक्ष यंदा मात्र दिसून आला नाही.

जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान तापमान साधारणपणे ३८ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. यंदाही तापमानाने चाळिशी ओलांडली, मात्र त्याची तीव्रता जाणवली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावे, याबाबत दरवर्षी सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून आले नाही. मागील वर्षी तापमानही ४२.५ अंश सेल्सिअसच्या वर गेलेले होते.

अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यातही तापमानाचा पारा 40 च्या वर होता.

ऊन वाढले तरी....

जिल्ह्यात एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. साधारणत: ४० अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान गेले होते. मात्र त्यावेळेसही उष्माघात कक्ष उभारण्याविषयी नियोजन झाले नाही. यंदा एप्रिल हीटही तसा जाणवला, मात्र कोरोनापुढे सर्व आजार आता थंड पडले आहेत.

उन्हाळा घरातच.....

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याने इतर काही छोटे आजार घरगुती उपचाराने बरे करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेकजण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायाला लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.

दरवर्षी प्रत्येक आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष असतो. तिथे रुग्ण आल्यास तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी उष्माघाताचा एकही रुग्ण आला नाही.

-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHeat Strokeउष्माघात