शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वडिलांचे छत्र हरपले, आता आईचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST

श्रीरामपूर : नगर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आघात झाला. काही पाल्यांचे आई-वडील दोघांचेही छत्र हरवले, तर काहींनी ...

श्रीरामपूर : नगर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आघात झाला. काही पाल्यांचे आई-वडील दोघांचेही छत्र हरवले, तर काहींनी घराचा एकमेव आधार असलेले वडील गमावले. जिल्ह्यातील ७६ मुलांवर अशी दुर्दैवी वेळ ओढावल्याची माहिती जिल्हा बालकल्याण विभागाकडून मिळाली.

राज्य व केंद्र सरकारने कोरोना संकटात अनाथ बनलेल्या मुलांसाठी विशेष योजना चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत मुलांचा सांभाळ करण्यापासून त्यांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा समावेश आहे. अनाथांना सज्ञान होईपर्यंत ठोस स्वरूपात मासिक आर्थिक मदतीचीही तरतूद करण्याची घोषणा सरकारने केली आहे. प्रत्यक्षात मात्र या योजना व संकल्प कितपत सत्यात उतरतो, हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबच बाधित झाल्याच्या अनेक घटना घडल्या. या तडाख्यातून लहान मुले बचावली गेली. मात्र, आई व वडील मृत्यू पावले. राज्य सरकारच्या यंत्रणेकडून आता अनाथ झालेल्या अशा मुलांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. अनाथांची आकडेवारी संकलित करून, तसेच त्यांची पडताळणी करून ही माहिती सरकारजमा केली जाणार आहे.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या मदतीने अंगणवाडीसेविका, तसेच मदतनिसांकडून जिल्ह्यातील अनाथ मुलांची माहिती संकलित केली जात आहे.

-------

७६ मुलांचे छत्र हरपले

नगर जिल्ह्यामध्ये आजअखेर ७६ मुलांचे कोरोनामुळे आई, वडील दोघांचेही छत्र हरपले आहे, तर सहा पाल्यांनी आई अथवा वडील यापैकी एकाला गमावले आहे.

------

बाल संगोपन योजना

अनाथ बनलेल्या मुलांकरिता सरकारच्या वतीने बाल संगोपन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत अनाथ मुलगा अथवा मुलगी यांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत प्रति महिना अकराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर, त्यांचे बालगृहामध्ये संगोपन केले जाते.

----

सामाजिक तपासणी अहवाल

बाल कल्याण समितीच्या वतीने अनाथ मुलांचा सामाजिक तपासणीचा अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालामध्ये मुलांच्या कौटुंबिक, तसेच आर्थिक माहितीचा समावेश असेल. मुलांचा सांभाळ करण्यासाठी जवळच्या नातेवाईक मंडळींची तयारी आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.

-----

अनाथ मुलांच्या फसवणुकीची शक्यता

अनाथ मुलांच्या नावावर काही संपत्ती असल्यास जवळच्या नातेवाइकांकडून त्यांची फसवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुलांच्या संपत्तीला संरक्षण पुरविण्यासाठी बाल कल्याण समितीच्या वतीने जिल्हा विधिसेवा प्राधिकरणची मदत घेतली जाणार आहे.

----

कोरोनामुळे अनाथ बनलेल्या मुलांविषयी कोणालाही काही माहिती असल्यास आम्हाला संपर्क करावा. या मुलांकरिता सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.

- वैभव देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी.

-----

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण : २,६५,४७१

उपचाराधीन रुग्ण : ८५२०

एकूण मृत्यू : ३,३५६

----