शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

श्रीगोंदा कुकडी कार्यालयावर शेतक-यांचा पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:07 IST

वितरिका क्रमांक १० ते १४ खालील शेतक-यांनी सोमवारी कुकडी पाटबंधारे विभागाच्या श्रीगोंदा येथील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.

श्रीगोंदा : रब्बीच्या दुस-या आवर्तनातून वंचित राहिलेल्या वितरिका १० ते १४ यांना आणि घोडेगाव तलावाला २० एप्रिल २०१८ च्या दरम्यान प्रथम प्राधान्याने पाणी दिल्यानंतरच कर्जत तालुक्याला पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वपक्षीय आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कुकडी पाटपाणी कृती समितीचे निमंत्रक प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिली.वितरिका क्रमांक १० ते १४ खालील शेतक-यांनी सोमवारी कुकडी पाटबंधारे विभागाच्या श्रीगोंदा येथील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. कुकडीच्या नारायणगाव विभागाने ३०० ते ४०० क्यूसेक पाणी घेतल्यामुळे श्रीगोंद्याला कमी पाणी मिळत होते. त्यामुळे १० ते १४ वितरिकांवरील सिंचन आणि घोडेगाव तलावात पाणी सोडता आले नाही. आता जे पाणी येत आहे ते लेंडी नाला आणि घोडेगाव तलावात सोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.प्रा.तुकाराम दरेकर यांनी अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी आणि बाबासाहेब भोस यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, आता मिळणारे पाणी घोडेगाव तलाव आणि लेंडी नाल्यात सोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांनतर १३ दिवसांनी म्हणजे १५ एप्रिल रोजी सुटणा-या तिस-या आवर्तनातून वितरिका १० ते १४ चे सिंचन व घोडेगाव तलावात प्रथम प्राधान्याने म्हणजे २० एप्रिल २०१८ च्या दरम्यान पाणी दिले जाणार आहे. त्यानंतरच किलोमीटर १६५ च्या खाली पाणी जाणार आहे, असाही निर्णय जाहीर करण्यात आला. प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते घेऊन तयार केलेल्या पाटपाणी कृती समितीची बैठक १६ एप्रिल २०१८ रोजी घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे, असेही प्रा. दरेकर म्हणाले.आंदोलनात बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, प्रशांत दरेकर, देवराव वाकडे, राजेंद्र म्हस्के, अनिल ठवाळ, मिलिंद दरेकर, शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, सतीश मखरे, विश्वास भुजबळ, महादेव लाळगे, देवीचंद भुजबळ, एम.टी. दरेकर,आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते व घन:शाम शेलार यांनी भेट दिली. कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी हे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आणि त्यांच्या पोलीस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा