शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोपरगावात शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:43 IST

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच ...

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच गोंधळ उडाला.शनिवारी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील शेतक-यांनी बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला. मात्र १ हजार ७०० रुपयांचा भाव काढल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर ज्ञानदेव रोहोम, संजय लोखंडे, जनार्दन रोहोम, विकास भिंगारे, अशोक लोखंडे, हरिभाऊ शिंदे आदी संतप्त शेतक-यांनी २ हजार ५०० चा भाव देण्याची मागणी करीत कांद्याचे लिलाव बंद पाडले. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. दरम्यान उपसभापती नानासाहेब गव्हाणे यांनी तातडीने शेतकरी व व्यापा-यांची बैठक घेऊन समजूत काढली. परंतु शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे एक वाजेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होऊ शकले नाहीत. सभापती मधुकर टेके व सचिव परसराम सिनगर उपस्थित होते.

लिलावात चुकीचे वागणा-यांवर कारवाई केली जाईल. व्यापा-यांनी सुध्दा शेतक-यांना अधिक मोबदला देण्याची काळजी घ्यावी. शेतक-यांनी व्यापा-यांना विनाकारण त्रास देऊ नये. लिलावास गैरहजर ३-४ व्यापा-यांना नोटिसा काढण्यात येतील. चुकीचे वागणा-या शेतक-यांना समज देण्यात येईल.-नानासाहेब गव्हाणे, उपसभापती

कांद्याला येवला-राहात्याप्रमाणे भाव देण्याची शेतक-यांची मागणी होती. त्यावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काही शेतकरी जाणीवपूर्वक लिलाव बंद पाडतात, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. आजचे भाव सरासरी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रूपये निघाले होते. लिलावास १५ पैकी १० व्यापारी हजर होते.-परसराम सिनगर, सचिव

ज्याचा माल नाही, त्याने व्यापा-याला शिवीगाळ केली. वास्तवत: ज्याचा माल आहे, त्यानेच आडत्याशी चर्चा करावी. इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. बाजार समितीने दोषी व्यापा-यांसह शेतक-यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा, पुढील लिलाव होणार नाहीत.-अजित लोहाडे, व्यापारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर