शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

राज्यात शेतकरी चिंतातुर,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST

उक्कलगाव : दोन वर्षांपासून राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे सर्वच व्यवस्था ठप्प झाल्या आहेत. शेतकरी चिंतातुर असताना वाळू माफिया मात्र बिनधास्तपणे ...

उक्कलगाव : दोन वर्षांपासून राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे सर्वच व्यवस्था ठप्प झाल्या आहेत. शेतकरी चिंतातुर असताना वाळू माफिया मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत, अशी टीका भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. गळनिंब येथे ३३ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव चिंधे होते.

विखे म्हणाले, शेतीमालाला सरकार भाव देऊ शकले नसल्याने उत्पादित माल शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. परंतु, सरकारला त्याची कुठलीही जाणीव नाही. गावपातळीवर आता युवकांनाच शेती आणि दुग्ध व्यवसायात एकत्रित येऊन काम करावे लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सामान्य माणसाला कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लोकांपासून हे सरकार दूर गेले आहे. बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाबरोबरच आता सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात कोल्हार ते बेलापूर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक झाल्यामुळेच या रस्त्याची दुर्दशा झाली. गळनिंब येथे प्रवरा सहकारी बँकेचा विस्तार कक्ष सुरू करण्याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे याप्रसंगी विखेंनी सांगितले. गळनिंब येथील सिद्धेश्वर देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही विखे यांनी दिली.

यावेळी व्यासपीठावर शरद नवले, सभापती संगीता शिंदे, माजी सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, कल्याणी कानडे, प्रवरा बॅंकेचे संचालक हनुमान चिंधे, चांगदेव भागवत, रामदास देठे, संपतराव चितळकर, आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य सेविकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी सरपंच शिवाजी चिंधे, उपसरपंच कविता भोसले, अनिता शेरमाळे, सुलोचना मारकड, दत्तात्रय माळी, बाळासाहेब वडितके, संजय शिंदे, अनिल चिंधे, शंकर वरखड, सोमनाथ चिंधे, आण्णासाहेब शिंदे, गोपीनाथ जाटे, बाळासाहेब पारखे, जनार्दन घोरपडे, गणपत चिंधे, रंगनाथ शिंदे, तान्हाजी देठे, डाॅ. सुनील चिंधे, मुख्याध्यापक अशोक नान्नोर उपस्थित होते.