शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतक-यांनी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञान वापरावे; डॉ. सी. वासुदेवप्पा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:43 IST

शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले. 

राहुरी :  शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले. 

जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती, जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत स्मार्ट प्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर दोन आठवड्यांचे आॅनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी शनिवारी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. वासुदेवप्पा बोलत होते.

 अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उपमहासंचालक डॉ.के.के.सिंग,डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ.दिलीप पवार, डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, डॉ.मिलिंद अहिरे, डॉ.उत्तम चव्हाण, डॉ.सुनील गोरटीवार, डॉ.मुकुंद शिंदे, प्रशिक्षणाचे आयोजन डॉ.विक्रम कड उपस्थित होते. 

शेतीमालापासून विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धीत पदार्थ बनविल्यास लोकांना चांगल्या प्रतिचे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यांचे आरोग्य चांगले राहिल. सद्यस्थितीमध्ये भारतात शेतीमालाच्या नुकसानीचे प्रमाण खूप मोठे आहे. जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान शेतीमालाच्या काढणी केल्यापासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत होते. त्याला असंख्य कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण शेतीमालाची हाताळणी हे होय. त्यासाठीच नवीन तंत्रज्ञानाचा पवार करण्याची गरज आहे, असेही वासुदेवप्पा यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीAgriculture Sectorशेती क्षेत्रuniversityविद्यापीठ