शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शेतक-यांनी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञान वापरावे; डॉ. सी. वासुदेवप्पा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:43 IST

शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले. 

राहुरी :  शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले. 

जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती, जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत स्मार्ट प्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर दोन आठवड्यांचे आॅनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी शनिवारी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. वासुदेवप्पा बोलत होते.

 अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उपमहासंचालक डॉ.के.के.सिंग,डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ.दिलीप पवार, डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, डॉ.मिलिंद अहिरे, डॉ.उत्तम चव्हाण, डॉ.सुनील गोरटीवार, डॉ.मुकुंद शिंदे, प्रशिक्षणाचे आयोजन डॉ.विक्रम कड उपस्थित होते. 

शेतीमालापासून विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धीत पदार्थ बनविल्यास लोकांना चांगल्या प्रतिचे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यांचे आरोग्य चांगले राहिल. सद्यस्थितीमध्ये भारतात शेतीमालाच्या नुकसानीचे प्रमाण खूप मोठे आहे. जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान शेतीमालाच्या काढणी केल्यापासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत होते. त्याला असंख्य कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण शेतीमालाची हाताळणी हे होय. त्यासाठीच नवीन तंत्रज्ञानाचा पवार करण्याची गरज आहे, असेही वासुदेवप्पा यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीAgriculture Sectorशेती क्षेत्रuniversityविद्यापीठ