शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

शेतकऱ्यांनी घाबरू नये, के. के. रेंजसाठी भूसंपादन होऊ देणार नाही, पालकमंत्री विखे यांची ग्वाही

By चंद्रकांत शेळके | Updated: August 28, 2023 21:10 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात के. के. रेंजसंदर्भात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होेते. नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यात २३ गावांतील जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराने जिल्हा प्रशासनाला दिला आहे

अहमदनगर : केे. के. रेंज येथे रणगाडा प्रशिक्षणासाठी जमीन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराकडून आला असला तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये. हे भूसंपादन होऊ देणार नाही. याऐवजी इतर ठिकाणच्या जागांचा विचार करावा, याबाबत राज्य सरकारशी चर्चा करू, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात के. के. रेंजसंदर्भात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होेते. नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यात २३ गावांतील जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. लष्कराचा प्रस्तावित क्षेत्र जास्त असल्याने तो देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. लष्कराकडे राजस्थानसह अन्य काही राज्यांमध्ये रणगाडा प्रशिक्षणासाठी मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे या पर्यायी क्षेत्राचा विचार त्यांनी करावा, असे संरक्षण विभागाला कळविले जाईल. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. राज्य सरकार म्हणून के. के. रेंजच्या विस्ताराला परवानगी मिळवून देणार नाही, असे विखे म्हणाले.

आधीच राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यातील शेतकरी के. के. रेंजमुळे होरपळलेले आहेत. त्यांच्या अडचणी आणखी वाढून देणार नाही. या विषयावर अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये व अधिकाऱ्यांवर संरक्षण खात्याच्या कोणाचा दबाव असेल तर त्याबाबत सांगावे. लष्कराला रणगाड्याच्या सरावासाठी दोन राज्यांत जमिनी उपलब्ध आहेत. लष्कर त्या ताब्यात का घेत नाही, असा प्रश्न आहे. ३१ ॲागस्टला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोणी येथे येणार आहेत. त्यांच्या निदर्शनासही ही बाब आणून देऊ, असे विखे म्हणाले.समन्वयातून जायकवाडी पाणी प्रश्न सोडवूजायकवाडी धरणासाठी नगर व नाशिक जिल्ह्यांतून पाणी सोडणार नाही, असे वक्तव्य उत्तरेतील राजकीय नेत्यांकडून झाल्याच्या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले, नगर-नाशिक काय किंवा मराठवाडा काय, पाण्याचा संघर्ष आहेच. पण सवंग लोकप्रिय घोषणा करून कोणी कायदा बदलू शकत नाही. त्यामुळे जायकवाडी खालच्या व वरच्या लोकांनी एकत्र येऊन व राजकीय भाषण टाळून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले पाहिजे. मागच्या दोन-तीन वर्षात पाऊस भरपूर असल्याने खरिपात आवर्तन सोडण्याची वेळ आली नव्हती, परंतु आता खरिपासाठीही पाणी सोडावे लागत आहे. खरिपाची पहिली व दुबार पेरणीही वाया गेली आहे, परंतु दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी धरणात पाणी ठेवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील