शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी घाबरू नये, के. के. रेंजसाठी भूसंपादन होऊ देणार नाही, पालकमंत्री विखे यांची ग्वाही

By चंद्रकांत शेळके | Updated: August 28, 2023 21:10 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात के. के. रेंजसंदर्भात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होेते. नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यात २३ गावांतील जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराने जिल्हा प्रशासनाला दिला आहे

अहमदनगर : केे. के. रेंज येथे रणगाडा प्रशिक्षणासाठी जमीन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराकडून आला असला तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये. हे भूसंपादन होऊ देणार नाही. याऐवजी इतर ठिकाणच्या जागांचा विचार करावा, याबाबत राज्य सरकारशी चर्चा करू, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात के. के. रेंजसंदर्भात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होेते. नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यात २३ गावांतील जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. लष्कराचा प्रस्तावित क्षेत्र जास्त असल्याने तो देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. लष्कराकडे राजस्थानसह अन्य काही राज्यांमध्ये रणगाडा प्रशिक्षणासाठी मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे या पर्यायी क्षेत्राचा विचार त्यांनी करावा, असे संरक्षण विभागाला कळविले जाईल. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. राज्य सरकार म्हणून के. के. रेंजच्या विस्ताराला परवानगी मिळवून देणार नाही, असे विखे म्हणाले.

आधीच राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यातील शेतकरी के. के. रेंजमुळे होरपळलेले आहेत. त्यांच्या अडचणी आणखी वाढून देणार नाही. या विषयावर अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये व अधिकाऱ्यांवर संरक्षण खात्याच्या कोणाचा दबाव असेल तर त्याबाबत सांगावे. लष्कराला रणगाड्याच्या सरावासाठी दोन राज्यांत जमिनी उपलब्ध आहेत. लष्कर त्या ताब्यात का घेत नाही, असा प्रश्न आहे. ३१ ॲागस्टला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोणी येथे येणार आहेत. त्यांच्या निदर्शनासही ही बाब आणून देऊ, असे विखे म्हणाले.समन्वयातून जायकवाडी पाणी प्रश्न सोडवूजायकवाडी धरणासाठी नगर व नाशिक जिल्ह्यांतून पाणी सोडणार नाही, असे वक्तव्य उत्तरेतील राजकीय नेत्यांकडून झाल्याच्या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले, नगर-नाशिक काय किंवा मराठवाडा काय, पाण्याचा संघर्ष आहेच. पण सवंग लोकप्रिय घोषणा करून कोणी कायदा बदलू शकत नाही. त्यामुळे जायकवाडी खालच्या व वरच्या लोकांनी एकत्र येऊन व राजकीय भाषण टाळून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले पाहिजे. मागच्या दोन-तीन वर्षात पाऊस भरपूर असल्याने खरिपात आवर्तन सोडण्याची वेळ आली नव्हती, परंतु आता खरिपासाठीही पाणी सोडावे लागत आहे. खरिपाची पहिली व दुबार पेरणीही वाया गेली आहे, परंतु दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी धरणात पाणी ठेवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील