शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी घाबरू नये, के. के. रेंजसाठी भूसंपादन होऊ देणार नाही, पालकमंत्री विखे यांची ग्वाही

By चंद्रकांत शेळके | Updated: August 28, 2023 21:10 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात के. के. रेंजसंदर्भात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होेते. नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यात २३ गावांतील जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराने जिल्हा प्रशासनाला दिला आहे

अहमदनगर : केे. के. रेंज येथे रणगाडा प्रशिक्षणासाठी जमीन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराकडून आला असला तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये. हे भूसंपादन होऊ देणार नाही. याऐवजी इतर ठिकाणच्या जागांचा विचार करावा, याबाबत राज्य सरकारशी चर्चा करू, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात के. के. रेंजसंदर्भात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होेते. नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यात २३ गावांतील जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव लष्कराने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. लष्कराचा प्रस्तावित क्षेत्र जास्त असल्याने तो देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. लष्कराकडे राजस्थानसह अन्य काही राज्यांमध्ये रणगाडा प्रशिक्षणासाठी मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे या पर्यायी क्षेत्राचा विचार त्यांनी करावा, असे संरक्षण विभागाला कळविले जाईल. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. राज्य सरकार म्हणून के. के. रेंजच्या विस्ताराला परवानगी मिळवून देणार नाही, असे विखे म्हणाले.

आधीच राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यातील शेतकरी के. के. रेंजमुळे होरपळलेले आहेत. त्यांच्या अडचणी आणखी वाढून देणार नाही. या विषयावर अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये व अधिकाऱ्यांवर संरक्षण खात्याच्या कोणाचा दबाव असेल तर त्याबाबत सांगावे. लष्कराला रणगाड्याच्या सरावासाठी दोन राज्यांत जमिनी उपलब्ध आहेत. लष्कर त्या ताब्यात का घेत नाही, असा प्रश्न आहे. ३१ ॲागस्टला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोणी येथे येणार आहेत. त्यांच्या निदर्शनासही ही बाब आणून देऊ, असे विखे म्हणाले.समन्वयातून जायकवाडी पाणी प्रश्न सोडवूजायकवाडी धरणासाठी नगर व नाशिक जिल्ह्यांतून पाणी सोडणार नाही, असे वक्तव्य उत्तरेतील राजकीय नेत्यांकडून झाल्याच्या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले, नगर-नाशिक काय किंवा मराठवाडा काय, पाण्याचा संघर्ष आहेच. पण सवंग लोकप्रिय घोषणा करून कोणी कायदा बदलू शकत नाही. त्यामुळे जायकवाडी खालच्या व वरच्या लोकांनी एकत्र येऊन व राजकीय भाषण टाळून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले पाहिजे. मागच्या दोन-तीन वर्षात पाऊस भरपूर असल्याने खरिपात आवर्तन सोडण्याची वेळ आली नव्हती, परंतु आता खरिपासाठीही पाणी सोडावे लागत आहे. खरिपाची पहिली व दुबार पेरणीही वाया गेली आहे, परंतु दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी धरणात पाणी ठेवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील