शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शेतक-यांना विमा भरपाई मिळावी - राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:44 IST

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.

राहाता : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. ऐन टंचाईच्या काळात विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहीलेल्या 8 हजार 462 शेतक-यांना झालेल्या आर्थिक भुर्दडांचे गांभीर्य लक्षात घेऊन या शेतक-यांना विमा भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या कृषि आयुक्तांकडे केली आहे.कृषि आयुक्त सुहास दिवसे यांना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी आकडेवारीसह पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहीलेल्या शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 10 हजार 19 कर्जदार आणि 7 हजार 956 बिगर कर्जदार अशा एकूण 17 हजार 975 शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारित फळपीकविमा योजनेत सहभाग घेवून 7 कोटी 55 लाख 62 हजार रुपयांचा विमा हप्ता भरणा केला होता. मात्र कर्जदार शेतक-यांपैकी फक्त 9 हजार 448 शेतक-यांनाच विमा रक्कम मंजूर झाली. यापैकी 571 शेतकरी भरपाईपासून वंचित राहीले आहेत तर बिगर कर्जदार शेतक-यांपैकी फक्त 65 शेतक-यांना विमा रकमेचा लाभ मिळाला असल्याने एकूण 8 हजार 462 शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहीले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सर्व शेतकरी विमा भरपाई मिळण्यासाठी पात्र असताना त्यांना लाभापासून वंचित ठेवने अयोग्य आहे याबाबत आपण गांभियार्ने लक्ष घालून शेतक-यांना विमा भरपाई रक्कम मिळवून द्यावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील