शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतक-यांना विमा भरपाई मिळावी - राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:44 IST

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.

राहाता : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. ऐन टंचाईच्या काळात विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहीलेल्या 8 हजार 462 शेतक-यांना झालेल्या आर्थिक भुर्दडांचे गांभीर्य लक्षात घेऊन या शेतक-यांना विमा भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या कृषि आयुक्तांकडे केली आहे.कृषि आयुक्त सुहास दिवसे यांना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी आकडेवारीसह पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहीलेल्या शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 10 हजार 19 कर्जदार आणि 7 हजार 956 बिगर कर्जदार अशा एकूण 17 हजार 975 शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारित फळपीकविमा योजनेत सहभाग घेवून 7 कोटी 55 लाख 62 हजार रुपयांचा विमा हप्ता भरणा केला होता. मात्र कर्जदार शेतक-यांपैकी फक्त 9 हजार 448 शेतक-यांनाच विमा रक्कम मंजूर झाली. यापैकी 571 शेतकरी भरपाईपासून वंचित राहीले आहेत तर बिगर कर्जदार शेतक-यांपैकी फक्त 65 शेतक-यांना विमा रकमेचा लाभ मिळाला असल्याने एकूण 8 हजार 462 शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहीले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सर्व शेतकरी विमा भरपाई मिळण्यासाठी पात्र असताना त्यांना लाभापासून वंचित ठेवने अयोग्य आहे याबाबत आपण गांभियार्ने लक्ष घालून शेतक-यांना विमा भरपाई रक्कम मिळवून द्यावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील