शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

कोपरगाव : राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत २०२१ - २२ या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास ...

कोपरगाव : राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत २०२१ - २२ या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. यात शेतकऱ्यांची एकदाच अर्ज करून विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले आहे.

आढाव म्हणाले, राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ट्रॅक्‍टरचलित सर्व प्रकारची अवजारे, पॉवर टिलर (छोटा ट्रॅक्टर), कांदा चाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण अशा विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावयाचा आहे. ही नोंदणी करताना गावातील सेतू कार्यालयात अर्ज करता येतो. या अर्जासाठी शेतकऱ्याने सातबारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक महत्त्वाचा आहे. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती या वर्गातील लाभार्थ्यांचा जातीचा दाखला आदी कागदपत्र आवश्यक आहे.

विशेष म्हणजे २०२० - २०२१ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना आपल्या मागणीत बदल करावयाचा असल्यास तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेत सहभाग घ्यावा. असेही आढाव यांनी शेवटी म्हटले आहे.