आॅनलाइन लोकमतआश्वी (अहमदनगर), दि़ ३० - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दाढ बुद्रूक येथील तरुण शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़दाढ बुद्रूक (ता़ राहता) परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ तीन दिवसांपासून रात्री व दिवसाही वीज पुरवठा खंडित होत आहे़ त्यामुळे पाणी असूनही पिके जळू लागली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली़ शनिवारी रात्रभर वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता़ त्यामुळे रविवारी सकाळी दाढ बुद्रूक येथील वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी करणाऱ्या विजय कोतकर या शेतकऱ्याला महावितरणच्या अनागोंदीचा मनस्ताप सहन करावा लागला़ त्यामुळे कोतकर यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी तेथेच उभ्या असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याने कोतकर यांच्या हातातील काडेपेटी हिसकावून घेतली़ त्यामुळे पुढील अनर्थ टळला़ या घटनेची माहिती समजताच डॉ़ दिपक तांबे, भारत तांबे, देवीचंद तांबे, अस्लम शेख, अनिल तांबे, सुभाष तांबे, सचिन तांबे आदी तात्काळ सबस्टेशनमध्ये दाखल झाले़गेल्या वर्षी दुष्काळामुळे पिके जळाली़ ते कर्ज डोक्यावर असताना या वर्षी नवीन कर्ज घेऊन पिक उभे केले़ पाणी असूनही वीजेअभावी पिके जळू लागली़ त्यामुळे जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेले शेतकरी विजय कोतकर यांनी सांगितले़
महावितरणच्या अनागोंदीला कंटाळून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: April 30, 2017 16:32 IST