शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना टनामागे २०० रूपयांचा फटका; राहुरी तालुक्यात तीन लाख टन ऊस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:45 IST

सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात प्रथमच शेतक-यांना जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळू लागला आहे. कारखान्यांनी २३०० रूपये टनावरून भाव २१०० रूपये टन केला आहे. 

भाऊसाहेब येवलेराहुरी : सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात प्रथमच शेतक-यांना जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळू लागला आहे. कारखान्यांनी २३०० रूपये टनावरून भाव २१०० रूपये टन केला आहे. राहुरी तालुक्यातील ऊस मार्च अखेरीस संपत असून तीन लाख टन ऊस उभा असल्याची अधिकृृत आकडेवारी समोर आली आहे.राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगरने मंगळवारपर्यंत २ लाख ६२ हजार टन उसाचे गाळप केले. कारखान्याचा सरासरी उतारा १०़२५ टक्के आहे. तनपुरे सहकारी कारखान्याने १ लाख २५ हजार ८८१ टन उसाचे गाळप केले असून सरासरी उतारा १०़८० टक्के आहे.प्रसाद व तनपुरे कारखान्याने सुरूवातीस २३०० रूपये प्रतिटन उसाला भाव दिला. मात्र साखरेचे भाव कोसळल्याचे कारण सांगत दोन्ही साखर कारखान्यांनी २१०० रूपये टन भाव उसाला भाव दिला आहे. साखरेचे भाव घसरल्यामुळे शेतक-यांना प्रतिटन २०० रूपयांचा फटका बसला आहे. कारखान्यांनी भाव जाहीर केल्यानंतर त्यामध्ये घट होण्याची ही सहकारी चळवळीतील पहिलीच घटना आहे.यंदा उसाला तीन हजार रूपये टन भाव मिळेल, अशी शेतक-यांना अपेक्षा होती़ गेल्या दोन वर्षात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतक-यांनी हक्काचे पीक म्हणून उसाला प्राधान्य दिले. खते,औषधे,मजुरी याचे दर वाढले असतांना उसाला कमी भाव मिळत असल्याने ऊस शेती संकटात आली आहे. त्यातच ऊस तोडणी कामगारांनी शेतक-यांकडून जबरदस्तीने दक्षिणेच्या नावाखाली लूट सुरू केली आहे.साखरेच्या भावानुसार दर देण्याची भूमिका जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने १७ टक्के साखर व्यापा-यांना विकून उर्वरित साखर गोदामातच ठेवण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे साखरेचे दर वाढण्याची अपेक्षा आहे.

साखर कारखाने सुरू होऊन तीन साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. केंद्र सरकारने सुरूवातीलाच साखरेबाबत निर्बंध आणणे गरजेचे होते. त्याचा चांगला फायदा शेतक-यांना झाला असता. सरकारच्या धोरणामुळे काही प्रमाणात साखरेचे दर वाढतील़ साखरेचे दर कमी झाल्याने भाव कमी करावे लागले.-प्राजक्त तनपुरे, अध्यक्ष, प्रसाद शुगर.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी