शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरीच करतात आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

श्रीरामपूर : महावितरण कंपनीची नादुरुस्त अथवा बिघाड झालेली वीज रोहित्रे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच आटापिटा करावा लागत आहे. महावितरणकडून वेळेत सेवा ...

श्रीरामपूर : महावितरण कंपनीची नादुरुस्त अथवा बिघाड झालेली वीज रोहित्रे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच आटापिटा करावा लागत आहे. महावितरणकडून वेळेत सेवा मिळत नसल्याने शेतकरी लोकवर्गणी करून खासगी वर्कशॉपमधून रोहित्रे दुरुस्त करून घेतात. त्यासाठी १८ ते २५ हजार रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याशिवाय वीजबिलांचा खर्चही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत आहे.

श्रीरामपूर येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत राहुरी व राहाता तालुक्याचा काही भाग येतो. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये शेती व घरगुती ग्राहकांचे ५ हजारावर वीज रोहित्रे आहेत. त्यातील १०० रोहित्रे दर महिन्याला नादुरुस्त होतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने हे प्रमाण कमी आहे. मात्र रब्बी हंगामामध्ये वीज पंपांचा वापर वाढताच रोहित्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढते.

श्रीरामपूर येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर माहिती घेतली असता महावितरणचा हा सावळा गोंधळ समोर आला. महिन्याला शंभरावर नादुरुस्त झालेली रोहित्रे येथे येत आहेत. मात्र पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी रोहित्रे दुरुस्त करून कार्यान्वित करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत आहे. नाशिक येथील विभागीय कार्यालयाकडून रोहित्रांसाठी आवश्यक असणारे ऑईल वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आणखी अडचणी उद्भवतात, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून देण्यासाठी राखीव रोहित्रे उपलब्ध नाहीत. मात्र घरगुती ग्राहकांना वेळेवर सेवा देण्याचा प्रयत्न असतो, असे सांगण्यात आले.

-------------

१८ ते २५ हजार खर्च

खासगी वर्कशॉपमध्ये वीज रोहित्रे दुरुस्तीचा खर्च १८ ते २५ हजार रुपये येतो. नादुरुस्त रोहित्रे खाली उतरविण्यापूर्वी वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा बंद करावा लागतो. त्याकरिता काही झिरो वायरमन गावोगावी कार्यरत झाले आहेत. त्यांनाही पैसे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.

-----------

वीज कायदा २००३ मधील तरतूद

शहरी भागामध्ये २४ तासात तर ग्रामीण भागामध्ये ७२ तासांमध्ये वीज रोहित्रे दुरुस्त करून मिळावी, असे वीज नियामक आयोगाने सांगितले आहे. तशी सेवा मिळाली नाही तर ग्राहकांना प्रती तास ५० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी कायद्यात तरतूद आहे.

----------

वीज बिलांची महसुली वसुली आणि तांत्रिक बिघाड या दोन स्वतंत्र बाबी आहेत. थकीत वीजबिलांमुळे ग्राहकांना सेवा नाकारता येत नाही. वीज रोहित्रांच्या तांत्रिक बिघाडाच्या आड बिलांची वसुली करून घेणे गैर आहे.

-अनिल औताडे, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना.

-------

वीज रोहित्र नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना कोणताही खर्च करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी संबंधित शाखा अभियंत्याला माहिती द्यावी. त्यानंतर महावितरणने नेमलेल्या खासगी एजन्सीमार्फत रोहित्राची दुरुस्ती केली जाते. मात्र त्या रोहित्रावरील बिले थकबाकीत नसावीत.

सुनील काकडे, अधीक्षक अभियंता, अहमदनगर