शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरीच करतात आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

श्रीरामपूर : महावितरण कंपनीची नादुरुस्त अथवा बिघाड झालेली वीज रोहित्रे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच आटापिटा करावा लागत आहे. महावितरणकडून वेळेत सेवा ...

श्रीरामपूर : महावितरण कंपनीची नादुरुस्त अथवा बिघाड झालेली वीज रोहित्रे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच आटापिटा करावा लागत आहे. महावितरणकडून वेळेत सेवा मिळत नसल्याने शेतकरी लोकवर्गणी करून खासगी वर्कशॉपमधून रोहित्रे दुरुस्त करून घेतात. त्यासाठी १८ ते २५ हजार रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याशिवाय वीजबिलांचा खर्चही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत आहे.

श्रीरामपूर येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत राहुरी व राहाता तालुक्याचा काही भाग येतो. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये शेती व घरगुती ग्राहकांचे ५ हजारावर वीज रोहित्रे आहेत. त्यातील १०० रोहित्रे दर महिन्याला नादुरुस्त होतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने हे प्रमाण कमी आहे. मात्र रब्बी हंगामामध्ये वीज पंपांचा वापर वाढताच रोहित्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढते.

श्रीरामपूर येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर माहिती घेतली असता महावितरणचा हा सावळा गोंधळ समोर आला. महिन्याला शंभरावर नादुरुस्त झालेली रोहित्रे येथे येत आहेत. मात्र पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी रोहित्रे दुरुस्त करून कार्यान्वित करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत आहे. नाशिक येथील विभागीय कार्यालयाकडून रोहित्रांसाठी आवश्यक असणारे ऑईल वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आणखी अडचणी उद्भवतात, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून देण्यासाठी राखीव रोहित्रे उपलब्ध नाहीत. मात्र घरगुती ग्राहकांना वेळेवर सेवा देण्याचा प्रयत्न असतो, असे सांगण्यात आले.

-------------

१८ ते २५ हजार खर्च

खासगी वर्कशॉपमध्ये वीज रोहित्रे दुरुस्तीचा खर्च १८ ते २५ हजार रुपये येतो. नादुरुस्त रोहित्रे खाली उतरविण्यापूर्वी वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा बंद करावा लागतो. त्याकरिता काही झिरो वायरमन गावोगावी कार्यरत झाले आहेत. त्यांनाही पैसे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.

-----------

वीज कायदा २००३ मधील तरतूद

शहरी भागामध्ये २४ तासात तर ग्रामीण भागामध्ये ७२ तासांमध्ये वीज रोहित्रे दुरुस्त करून मिळावी, असे वीज नियामक आयोगाने सांगितले आहे. तशी सेवा मिळाली नाही तर ग्राहकांना प्रती तास ५० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी कायद्यात तरतूद आहे.

----------

वीज बिलांची महसुली वसुली आणि तांत्रिक बिघाड या दोन स्वतंत्र बाबी आहेत. थकीत वीजबिलांमुळे ग्राहकांना सेवा नाकारता येत नाही. वीज रोहित्रांच्या तांत्रिक बिघाडाच्या आड बिलांची वसुली करून घेणे गैर आहे.

-अनिल औताडे, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना.

-------

वीज रोहित्र नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना कोणताही खर्च करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी संबंधित शाखा अभियंत्याला माहिती द्यावी. त्यानंतर महावितरणने नेमलेल्या खासगी एजन्सीमार्फत रोहित्राची दुरुस्ती केली जाते. मात्र त्या रोहित्रावरील बिले थकबाकीत नसावीत.

सुनील काकडे, अधीक्षक अभियंता, अहमदनगर