शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जपताहेत गावरान आंब्यांचे वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST

अकोले : ग्रामीण भागात पूर्वी चवीनुसार गावरान आंब्याची नावे मदग्या, गुळच्या, खोबऱ्या, आमट्या, चपट्या, गोधड्या, आषाढ्या, पोपटनाक्या अशी मजेशीर ...

अकोले : ग्रामीण भागात पूर्वी चवीनुसार गावरान आंब्याची नावे मदग्या, गुळच्या, खोबऱ्या, आमट्या, चपट्या, गोधड्या, आषाढ्या, पोपटनाक्या अशी मजेशीर होती. आता हे गावरान वाण संपुष्टात आले असून त्यांची जागा हापूस, केशर, पायरीने घेतली आहे. काल परत्वे दुर्मिळ होत चालले गावरान-रायवळ आंबे वाण जतन करण्यासाठीच्या जनजागृतीचा वसा पर्यावरणवादी शेतकरी रमाकांत डेरे यांनी घेतला आहे.

प्रवरा नदी काठावरील चितळवेढे येथील व आदिवासी भागातील धामणवन येथील शेतजमिनीच्या बांधांवर ४० प्रकारचे आंब्याची वृक्ष लावून रायवळ वाण जतन केले आहे. तसेच हापूस, केशर, रत्ना, पायरी, लंगडा, राजापुरी, तोतापुरी, आम्रपाली, सिंधू असे विविध कलमी आंब्याची वृक्ष देखील त्यांच्या संग्रही आहेत. गर्दणी, रेडे, आगार, इंदोरी, रूंभोडी, मेहेंदुरी परिसरात मोठ्या आमराया पूर्वी होत्या, बागायती क्षेत्र वाढल्याने आमराया नामशेष झाल्या. गावठी आंब्याची गोडी टिकून राहावी म्हणून काही शेतकरी प्रयत्नात आहेत. त्यातील एक नाव डेरे हे आहे. निसर्गामध्ये आंब्याच्या नानाविधी जाती दडलेल्या आहेत. या जातींचे संवर्धन व्हावे व त्यांचे जतन करून पुढच्या पिढीसाठी त्यांचा उपयोग व्हावा या हेतूने ते गेली चाळीसहून अधिक वर्षे झटत आहेत. त्यांनी आपल्या शेतावर तसेच शाळा, महाविद्यालय, शासकीय वसतिगृह, ग्रामपंचायत यांच्या माध्यमाने निसर्गातील अमूल्य अशा आंब्याच्या वाणांचा संग्रह करून जतन करणे यावर भर दिला आहे. आंब्याचे वानांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते प्रत्येक वर्षी तालुक्यातील विविध शाळा, संस्था, महाविद्यालय, ग्रामपंचायत, शेतकरी समूह, आदिवासी महिला शेतकरी समूह इत्यादी ठिकाणी भेटी देऊन तांत्रिक प्रशिक्षण देत मार्गदर्शन करतात. आंब्याच्या झाडाचे महत्त्व पटवून देतात व स्वतःच्या घराजवळ आंब्याच्या कोया उगवून ही रोपे लागवडीसाठी देत असतात. त्यांनी विकसित केलेल्या जल आणि मृदसंधारण पद्धतीने पावसाच्या पाण्यावर आंब्याची झाडे उगवली व वाढवली जातात. त्यांच्या अनुभवानुसार गेल्या चाळीस वर्षात हजारो आंब्याची झाडे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर व शाळा परिसरात तयार केलेले आहेत. बांंधांवर पुन्हा आमराया बहरू लागल्या आहेत.

..............

पर्यावरणवादी शेतकरी रमाकांत डेरे यांनी जतन केलेल्या गावठी रायवळ आंब्यांच्या प्रजाती पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाच्या आहे. मातृवृक्ष म्हणून त्यांचे जतन होणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. रायवळ आंब्याचा स्वामित्व अधिकार शेतकरी मिळवू शकतात.

- जितीन साठे, गावरान बियाणे संवर्धन तज्ज्ञ

........फोटो आहे --डेरे