शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या कर्जमाफी योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अजित काळे यांचा आरोप

By शिवाजी पवार | Updated: December 27, 2023 12:59 IST

योजनेतून लाखो शेतकरी वगळलेे, खंडपीठाच्या आदेशाने दिलासा.

शिवाजी पवार 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या कर्जमाफी योजनांमधून प्रत्येक वेळी लाखो शेतकरी वगळले जात आहेत. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांमागे ते एक प्रमुख कारण आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी केली.

येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. काळे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शिवाजी जवरे, सुदाम औताडे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली होती. मात्र योजनेचे पोर्टल अचानक बंद करून कर्जमाफीची प्रक्रिया थांबविण्यात आली. त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने श्रीरामपूर तालुक्यातील याचिकाकर्ते दोघा शेतकऱ्यांना तत्काळ ऑफलाईन पैसे अदा करण्याचे आदेश दिले. उर्वरित राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचेही आदेशात म्हटले. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने अवमान याचिका दाखल केली गेली. दोषी व्यक्तींना तुरुंगात पाठविण्याची मागणी त्यात करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या अधिवेशनात साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली.

सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी, त्यापुढील कर्जासाठी एकरकमी परतफेड योजना तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान असे योजनेचे तीन टप्पे होते. योजनेत ८९ लाख शेतकरी पात्र ठरले. एकूण ३४ हजार कोटी रुपये त्यासाठी खर्चाची तरतूद करावी लागणार होती. ७७ लाख शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र उर्वरित १२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळाला नाही. कारण सरकारने योजनेचे पोर्टल अचानक बंद केले. पाच हजार ८३६ कोटी रुपये हे एकरकमी परतफेड योजनेचे तसेच दोन हजार ९२५ कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे शेष आहेत, असे ॲड. काळे यांनी सांगितले.