शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

फसव्या कर्जमाफी योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अजित काळे यांचा आरोप

By शिवाजी पवार | Updated: December 27, 2023 12:59 IST

योजनेतून लाखो शेतकरी वगळलेे, खंडपीठाच्या आदेशाने दिलासा.

शिवाजी पवार 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या कर्जमाफी योजनांमधून प्रत्येक वेळी लाखो शेतकरी वगळले जात आहेत. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांमागे ते एक प्रमुख कारण आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी केली.

येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. काळे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शिवाजी जवरे, सुदाम औताडे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली होती. मात्र योजनेचे पोर्टल अचानक बंद करून कर्जमाफीची प्रक्रिया थांबविण्यात आली. त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने श्रीरामपूर तालुक्यातील याचिकाकर्ते दोघा शेतकऱ्यांना तत्काळ ऑफलाईन पैसे अदा करण्याचे आदेश दिले. उर्वरित राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचेही आदेशात म्हटले. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने अवमान याचिका दाखल केली गेली. दोषी व्यक्तींना तुरुंगात पाठविण्याची मागणी त्यात करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या अधिवेशनात साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली.

सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी, त्यापुढील कर्जासाठी एकरकमी परतफेड योजना तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान असे योजनेचे तीन टप्पे होते. योजनेत ८९ लाख शेतकरी पात्र ठरले. एकूण ३४ हजार कोटी रुपये त्यासाठी खर्चाची तरतूद करावी लागणार होती. ७७ लाख शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र उर्वरित १२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळाला नाही. कारण सरकारने योजनेचे पोर्टल अचानक बंद केले. पाच हजार ८३६ कोटी रुपये हे एकरकमी परतफेड योजनेचे तसेच दोन हजार ९२५ कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे शेष आहेत, असे ॲड. काळे यांनी सांगितले.