शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

फसव्या कर्जमाफी योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अजित काळे यांचा आरोप

By शिवाजी पवार | Updated: December 27, 2023 12:59 IST

योजनेतून लाखो शेतकरी वगळलेे, खंडपीठाच्या आदेशाने दिलासा.

शिवाजी पवार 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या कर्जमाफी योजनांमधून प्रत्येक वेळी लाखो शेतकरी वगळले जात आहेत. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांमागे ते एक प्रमुख कारण आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी केली.

येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. काळे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शिवाजी जवरे, सुदाम औताडे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली होती. मात्र योजनेचे पोर्टल अचानक बंद करून कर्जमाफीची प्रक्रिया थांबविण्यात आली. त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने श्रीरामपूर तालुक्यातील याचिकाकर्ते दोघा शेतकऱ्यांना तत्काळ ऑफलाईन पैसे अदा करण्याचे आदेश दिले. उर्वरित राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचेही आदेशात म्हटले. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने अवमान याचिका दाखल केली गेली. दोषी व्यक्तींना तुरुंगात पाठविण्याची मागणी त्यात करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या अधिवेशनात साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली.

सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी, त्यापुढील कर्जासाठी एकरकमी परतफेड योजना तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान असे योजनेचे तीन टप्पे होते. योजनेत ८९ लाख शेतकरी पात्र ठरले. एकूण ३४ हजार कोटी रुपये त्यासाठी खर्चाची तरतूद करावी लागणार होती. ७७ लाख शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र उर्वरित १२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळाला नाही. कारण सरकारने योजनेचे पोर्टल अचानक बंद केले. पाच हजार ८३६ कोटी रुपये हे एकरकमी परतफेड योजनेचे तसेच दोन हजार ९२५ कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे शेष आहेत, असे ॲड. काळे यांनी सांगितले.