शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 21:00 IST

सततच्या नापिकीमुळे आणि खाजगी संस्थांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी अशोक एकनाथ मगर (वय ४५) यांनी मंगळवारी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

लोणी (जि. अहमदनगर) : सततच्या नापिकीमुळे आणि खाजगी संस्थांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी अशोक एकनाथ मगर (वय ४५) यांनी मंगळवारी (दि.११) सकाळी आपल्या राहात्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मगर यांच्या नावे गोगलगाव येथे तीन एकर कोरडवाहू शेतजमीन असल्याने ते इतरत्र मोलमजुरी करून पत्नी आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होते. स्वत:च्या शेतजमिनीसाठी पाणी नसल्यामुळे गोगलगाव येथील आपल्या राहात्या घराजवळच लक्ष्मण उगले यांची शेतजमीन (गट नं. ७६) अशोक यांनी वाट्याने कसण्यासाठी घेतली होती. याही शेतजमिनीत पेरलेला गहू पाण्याअभावी करपून गेला होता. या पिकांसाठी केलेला खर्च वसूल होईल की नाही या धास्तीने ते चिंताग्रस्त होते. त्यातच वर्षापूर्वी श्रीराम फायन्सास या खाजगी कंपनीकडून त्यांनी गायीसाठी कर्ज घेतले होते. याचाही त्यांच्याकडे तगादा सुरू होता. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहात्या घराजवळ लक्ष्मण उगले यांच्या शेतजमिनीतील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. लोणी (ता.राहाता) येथून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगलगावातल ही दीड वर्षातील चौथी शेतकरी आत्महत्या आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताFarmerशेतकरी