शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

तुटपुंजा मदतीचा निषेध करुन शेतक-याने राज्यपालांना पाठविला आठ हजाराचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:19 IST

मुंगी (ता. शेवगाव) येथील रवि रावसाहेब देशमुख या तरुण शेतक-याने आपल्या खात्यावर मदत मिळण्याआधीच एक हेक्टर क्षेत्राचा आठ हजार रूपयांचा धनादेश राज्यपालांना पाठविला आहे.

बोधेगाव  : अवकाळी पावसाने खरीप पिकांसह फळे, भाजीपाला आदी लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. भरपाईपोटी राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतक-यांच्या खरीप पिकांसाठी जाहीर केलेली ही मदत अतिशय तोकडी आहे. त्यातून मशागतीचा खर्चही निघणार नाही. या निर्णयाचा निषेध करत शेतक-यांना हेक्टरी एक लाख रूपयांपर्यंतची भरीव मदतवाढ द्यावी, अशी मागणी करत मुंगी (ता. शेवगाव) येथील रवि रावसाहेब देशमुख या तरुण शेतक-याने आपल्या खात्यावर मदत मिळण्याआधीच एक हेक्टर क्षेत्राचा आठ हजार रूपयांचा धनादेश राज्यपालांना पाठविला आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथील पोस्ट कार्यालयामार्फत स्पीड पोस्टने त्यांनी राज्यपालांना हा धनादेश पाठविला आहे. मागील महिन्यात राज्यात सर्वत्र कोसळलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. शेतक-यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्रशासनाने आपला नुकसानीचा अहवाल शासनाकडे दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रशासकीय आढावा घेत खरीप पिकांसाठी सरसकट हेक्टरी ८ हजार रुपए तर फळबागांसाठी १८ हजार रुपए मदत जाहीर  केली. राज्यपालांनी घोषित केल्याप्रमाणे गुंठ्याला अवघ्या ८० रूपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. शेतकºयांना हेक्टरी एक लाख रुपए नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत मुंगी (मूळ गाव उमापूर, ता. गेवराई, जि.बीड) येथील रवि देशमुख या तरुण शेतक-याने ८ हजार रूपयांचा धनादेश बोधेगाव येथील पोस्ट कार्यालयामार्फत राज्यपालांना पाठविला आहे. देशमुख यांना साडेसात एकर शेती असून आजोबांच्या नावे मुंगी येथे साडेतीन एकर शेतजमीन आहे. धनादेशासोबतच त्याने राज्यपालांना एक पत्रही लिहिले आहे. त्या पत्रानुसार शेतक-यांचे सरसकट कर्ज माफ करून ओला  दुष्काळ जाहीर करावा, खरीप पिकांचा विमा तत्काळ लागू करावा, पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत  मिळणारी रक्कम वार्षिक ६० हजार रुपए करावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी