शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कुटुंब नियोजन- पुरूषांनी फिरविली नसबंदीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:27 IST

१९६२ मध्ये भारत सरकारने तिसऱ्या पंचवार्षिक योजनेंतर्गत लोकसंख्या स्थिरीकरणासाठी सुरू केलेल्या कुटुंब कल्याण नसबंदीकडे पुरूषांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी महिलांनाच पार पाडावी लागत आहे.

दिलीप चोखरराहाता : १९६२ मध्ये भारत सरकारने तिसऱ्या पंचवार्षिक योजनेंतर्गत लोकसंख्या स्थिरीकरणासाठी सुरू केलेल्या कुटुंब कल्याण नसबंदीकडे पुरूषांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी महिलांनाच पार पाडावी लागत आहे.नसबंदी कार्यक्रमास प्रारंभी पुरूषांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मात्र नंतर हळूहळू पुरुषांनी नसबंदीकडे पाठ फिरविल्याने नसबंदी शस्त्रक्रियेची जबाबदारी स्त्रियांनाच पेलावी लागत आहे. लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो , जड काम करावे लागते अशी कारणे देत पुरूष नसबंदीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. सरकारचे संतती नियमनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून महिलांचे दुस-या प्रसूतीनंतर समुपदेशन करून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करीत निर्धारित लक्ष्य पूर्ण केले जात आहे. या तुलनेत पुरूषांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाकडून पाठपुरावा केला जात नाही. महिलांच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी प्रसूतीगृहांनीही कंबर कसली आहे. पण तेथेही पुरूष शस्त्रक्रियेबाबत उदासीनता पहावयास मिळत आहे.

पुरूषांची शस्त्रक्रिया सोपी

संतती नियमन ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. पुरूष किंवा स्त्री यापैकी एकाने ती करायची असते. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेपेक्षा पुरूषांची शस्त्रक्रिया सोपी आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरूषांना तासाभरात घरी सोडले जाते. तो सात दिवसानंतर कोणतेही जड काम करू शकतो. संतती नियमन शस्त्रक्रियेनंतर लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. कोणतेही पथ्य पाळावे लागत नाही. पुरुषांना या शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून बाराशे रूपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. त्या तुलनेत स्त्रियांची शस्त्रक्रिया अवघड आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांना सात दिवस रूग्णालयात थांबावे लागते. तसेच नंतर पथ्य पाळावे लागते. त्यामुळे पुरूषांनी स्वत:हून संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी पुढे आले पाहिजे. याबाबत सर्व स्तरावर प्रबोधन होणेही गरजेचे आहे, स्त्री रोग तज्ज्ञ, तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती म्हस्के सांगितले.

आकडेवारी बोलते

वर्ष              लक्ष्य             पुरुष         महिला             प्रस्तावित लक्ष्य२०१५-१६  ५.६५लाख      १४,८००     ४,४६,८००         ८१.६२०१६-१७  ५.६५ लाख     १३९००       ४,३८,८००        ८०.१२०१७-१८  ५.६५ लाख     ८८६० २,    ८३,२००           ५२.०(संदर्भ : महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल २०१७-१८)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealthआरोग्य