शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

राज्य सरकारचे अपयश केंद्राच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:22 IST

कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी (दि. १७) सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते ...

कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी (दि. १७) सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, भाजपचे नेते बाळासाहेब परागसंधान, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, गेल्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली होती. ती मदतही अजून पोहोचली नाही. कोकणात वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या. यावेळी नुकसान कमी व्हावे, अशी अपेक्षा आहे. आपत्तीत राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे. राज्य सरकारच्या चुकीमुळे राज्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. सुरुवातीला सरकारने टेंडर काढले नाही. उशिरा काढले तर काही जिल्ह्यात टेंडरच झाले नाही. फळबागांच्या संदर्भात अनेक निकष यांनी बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तेथे मदत मिळाली नाही, त्यामुळे यासंदर्भात सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

---------------------

हे राज्याचे मोठे नुकसान

खा. राजीव सातव यांचे जाणे वेदनादायी आहे. कोरोनाच्या काळात अनेक नेते सोडून गेले. खा. राजीव सातव यांच्या बरोबरच मी काम केले आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी संबंध ठेवणारे ते चांगले नेते होेते. चांगले भविष्य असणारा नेता जेव्हा निघून जातो, तेव्हा हे राज्याचे मोठे नुकसान ठरते, अशी भावना फडणवीस यांनी खा. सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली.