शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत विकास कामांसाठी मुदतवाढ : दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:46 IST

महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अहमदनगर : महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.शासनाकडून महानगरपालिकेस मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत तीन कोटी मंजूर केले होते. सदर निधीच्या कामांचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीपुढे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानुसार सदर कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र ही कामे पूर्ण करण्याचा कालावधी जून २०१८ अखेर होता. या कामांसाठी प्रथम ई-निविदा प्रसिद्ध केल्यानंतर निविदाधारकांकडून पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. विकास कामांना मुदतवाढ दिल्याने मोठा कालापव्यय झालेला आहे. निविदा स्वीकृतीनंतर ठेकेदारांकडून सुरक्षा रक्कम भरून घेणे, करारनामा करणे, कार्यारंभ आदेश देणे, प्रत्यक्षात कामे पूर्ण करून ठेकेदारास देयके अदा करणे या सर्व बाबी लक्षात घेता सदरची कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण होणार नसल्याचे खा. गांधी यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना निदर्शनास आणले. त्यामुळे मुदतवाढ आवश्यक असल्याचे लक्षात आणून दिले.महानगरपालिकेची मूलभूत सोयी सुविधा योजनेतील कामे काही तांत्रिक अडचणींमुळे जून २०१८ मध्ये पूर्ण होत नसल्याने सदरच्या कामांना डिसेंबर २०१८ अखेर मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाचे मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक महेश तवले, नगरसेविका मालनताई ढोणे, नगरसेविका मनीषाताई बारस्कर यांनी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे केली होती. यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची शुक्रवारी मंत्रालयात भेट घेतली. काही प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे कामे अपूर्ण राहिल्याने निधी अखर्चित राहिला तर नागरिकांसाठीची मूलभूत योजनेची कामे पूर्ण होणार नाहीत ही बाब प्रधान सचिवांच्या लक्षात आल्याने ही मुदतवाढ मिळाल्याचे खा. गांधी यांनी पत्रकात म्हटले आहे. याबाबत कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांनी महापालिकेस कळविले असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधी