शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

मूलभूत विकास कामांसाठी मुदतवाढ : दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:46 IST

महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अहमदनगर : महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.शासनाकडून महानगरपालिकेस मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत तीन कोटी मंजूर केले होते. सदर निधीच्या कामांचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीपुढे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानुसार सदर कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र ही कामे पूर्ण करण्याचा कालावधी जून २०१८ अखेर होता. या कामांसाठी प्रथम ई-निविदा प्रसिद्ध केल्यानंतर निविदाधारकांकडून पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. विकास कामांना मुदतवाढ दिल्याने मोठा कालापव्यय झालेला आहे. निविदा स्वीकृतीनंतर ठेकेदारांकडून सुरक्षा रक्कम भरून घेणे, करारनामा करणे, कार्यारंभ आदेश देणे, प्रत्यक्षात कामे पूर्ण करून ठेकेदारास देयके अदा करणे या सर्व बाबी लक्षात घेता सदरची कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण होणार नसल्याचे खा. गांधी यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना निदर्शनास आणले. त्यामुळे मुदतवाढ आवश्यक असल्याचे लक्षात आणून दिले.महानगरपालिकेची मूलभूत सोयी सुविधा योजनेतील कामे काही तांत्रिक अडचणींमुळे जून २०१८ मध्ये पूर्ण होत नसल्याने सदरच्या कामांना डिसेंबर २०१८ अखेर मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाचे मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक महेश तवले, नगरसेविका मालनताई ढोणे, नगरसेविका मनीषाताई बारस्कर यांनी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे केली होती. यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची शुक्रवारी मंत्रालयात भेट घेतली. काही प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे कामे अपूर्ण राहिल्याने निधी अखर्चित राहिला तर नागरिकांसाठीची मूलभूत योजनेची कामे पूर्ण होणार नाहीत ही बाब प्रधान सचिवांच्या लक्षात आल्याने ही मुदतवाढ मिळाल्याचे खा. गांधी यांनी पत्रकात म्हटले आहे. याबाबत कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांनी महापालिकेस कळविले असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधी